‘मोफत योजना बंद करा, त्यामुळे….’, आमदार सुरेश धस यांची सरकारकडे मागणी.

 सुरेश धस यांनी मोफत योजनेबद्दल सरकारकडे मागणी केली आहे. संगमनेरमध्ये एका खाजगी भेटीसाठी आले होते. त्यावेळा प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे.’गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्याने शेतावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. शिवाय सरकारकडून वाटप होणाऱ्या मोफत धान्याचा आणि इतर काही योजनांचा गैरवापरही होत आहे, त्यामुळे सरकारने अशा मोफत योजना बंद केल्या पाहिजेत,’ अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली.आमदार सुरेश धस संगमनेरला एका खासगी भेटीसाठी आले होते. त्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धस म्हणाले, ‘सरकारकडून अनेक मोफत लाभ देण्याच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकऱ्यांना मजुरांच्या घरी जाऊन विनंती करावी लागते. मात्र, मोफत धान्यामुळे अनेक लोक मजुरीचे काम करण्यास तयार होत नसल्याचा अनुभव येतो. त्यामुळे परराज्यातून मजूर आणण्याची वेळ आली आहे.

तसे झाले तर स्थानिक मजुरांचा रोजगार भविष्यात कमी होईल,’ अशी भीतीही धस यांनी व्यक्त केली.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्याचे मात्र त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले, ‘कोकाटे यांचा ग्रामीण भागाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे सरळ आहे. मात्र, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. कोकाटे यांचा शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता,’ असेही धस म्हणाले. संगमनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपील पवार यांची त्यांनी भेट घेतली.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री कुसुमताई पवार यांचे निधन झाले होते.केंद्र सरकारकडून देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. 26 मार्च 2020 रोजी, देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  जाहीर केली, ज्यामध्ये 80 कोटी लोकांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ किंवा गहू आणि प्रति कुटुंब 1किलो पसंतीची डाळ मोफत दिली जात होती. हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (NFSA) देण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या नियमित कोट्याव्यतिरिक्त होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.