‘मोफत योजना बंद करा, त्यामुळे….’, आमदार सुरेश धस यांची सरकारकडे मागणी.

 सुरेश धस यांनी मोफत योजनेबद्दल सरकारकडे मागणी केली आहे. संगमनेरमध्ये एका खाजगी भेटीसाठी आले होते. त्यावेळा प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे.’गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्याने शेतावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. शिवाय सरकारकडून वाटप होणाऱ्या मोफत धान्याचा आणि इतर काही योजनांचा गैरवापरही होत आहे, त्यामुळे सरकारने अशा मोफत योजना बंद केल्या पाहिजेत,’ अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली.आमदार सुरेश धस संगमनेरला एका खासगी भेटीसाठी आले होते. त्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धस म्हणाले, ‘सरकारकडून अनेक मोफत लाभ देण्याच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकऱ्यांना मजुरांच्या घरी जाऊन विनंती करावी लागते. मात्र, मोफत धान्यामुळे अनेक लोक मजुरीचे काम करण्यास तयार होत नसल्याचा अनुभव येतो. त्यामुळे परराज्यातून मजूर आणण्याची वेळ आली आहे.

तसे झाले तर स्थानिक मजुरांचा रोजगार भविष्यात कमी होईल,’ अशी भीतीही धस यांनी व्यक्त केली.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्याचे मात्र त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले, ‘कोकाटे यांचा ग्रामीण भागाशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे सरळ आहे. मात्र, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. कोकाटे यांचा शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता,’ असेही धस म्हणाले. संगमनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपील पवार यांची त्यांनी भेट घेतली.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री कुसुमताई पवार यांचे निधन झाले होते.केंद्र सरकारकडून देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. 26 मार्च 2020 रोजी, देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  जाहीर केली, ज्यामध्ये 80 कोटी लोकांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ किंवा गहू आणि प्रति कुटुंब 1किलो पसंतीची डाळ मोफत दिली जात होती. हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (NFSA) देण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या नियमित कोट्याव्यतिरिक्त होते.

  • Related Posts

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    पुण्यात एका इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध…

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी दुर्घटना घडली. पहिल्या घटनेत, नागभीड तालुक्यात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश दडमल आणि राकेश बदन या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, सिंदेवाहीजवळ तेंदुपत्ता तोडण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.

    आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

    आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

    हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.

    हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.