दोन गुण कमी पडले अन् आर्मीत भरती होण्याची संधी हुकली, तरुणाने नको तेच केलं, अख्खं धुळे सुन्न.

धुळ्यात एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या तरुणाला आर्मीत भरती व्हायचं होतं, पण अवघ्या दोन गुणांनी त्याची संधी हुकली. त्यातून तो नैराश्यात गेला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.भारतीय लष्करात भरती होऊन देशाची सेवा करावी, हे स्वप्न डोळ्यात घेत एका तरुणाने भरतीसाठी परीक्षा दिली. त्याला भारतीय लष्करात भरती व्हायचं होतं. मात्र, या परीक्षेत अवघ्य दोन गुणांनी त्याची हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी हुकली. धुळे तालुक्यातील रामी येथील उच्च शिक्षित तरुण या परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी मागे पडला. यामुळे त्याला इतकं नैराश्य आलं की त्याने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे.

या घटनेने संपूर्ण धुळ्यात एकच खळबळ माजली आहे.अक्षय यशवंत माळी (वय २१) असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे.अक्षय माळी हा शेतकरी असलेल्या यशवंत माळी यांचा मुलगा आहे. त्याने २५ मार्चला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास रामी गावालगत मोडळ नदी परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. येथे डॉ. विद्या गायकवाड यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अक्षय माळी हा उच्च शिक्षित तरुण होता. त्याने बीएस्सीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असतानाही त्याने परिस्थितीवर मात करत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवेचं स्वप्न पाहिलं होतं. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने यशवंत माळी यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या म्हातारपणातील आधार असलेला आपला लेक असा अचानक जगातून निघून गेल्याने ते शोकसागरात बुडाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.