चिमुकलीला संपवून बॅगेत भरलं, घरात लपवलं, मग खंडणीचा फोन; नवी मुंबईतील थरारक घटनेची उकल कशी झाली.

नवी मुंबईतील तळोजा भागात ३ वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद अन्सारीने क्षुल्लक कारणावरुन हे कृत्य केले. हत्येनंतर मुलीच्या कुटुंबाला खंडणीसाठी फोनही केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.नवी मुंबईतील तळोजा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका ३ वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा त्याच परिसरात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांमध्ये खेळण्यांवरून वाद झाला होता. याच कारणामुळे हे भयंकर कृत्य घडले आहे.आरोपी मोहम्मद अन्सारीच्या पत्नीचे आणि मृत मुलीच्या आईचे खेळण्यांवरून भांडण झाले होते. हे भांडण इतके वाढले की, अन्सारीने त्या चिमुकलीची निर्दयीपणे हत्या केली. डीसीपी (झोन II) प्रशांत मोहिते पाटील यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, आरोपी मोहम्मद अन्सारीला मोबाईल गेम्स खेळण्याची सवय होती. त्याने या गेम्समध्ये ४०,००० रुपये खर्च केले होते. मानसिक तणावाखाली असलेल्या अन्सारीने रागातून आणि बदला घेण्याच्या भावनेतून हे कृत्य केले आहे.

तळोजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर अन्सारीने मुलीचा मृतदेह एका बॅगमध्ये लपवला. त्याने तो मृतदेह पीडित कुटुंबाच्या घरातील टॉयलेट सीटवर ठेवला होता. त्यानंतर त्याने मुलीचे वडील अमरीश शर्मा यांना फोन केला आणि खंडणी मागितली. चिमुकलीचं अपहरण झालं असवल्याचं भासवण्याचा प्रयत्न त्याने केला. अमरीश शर्मा यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मोहम्मद अन्सारीवर संशय आला आणि चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.

तळोजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.आरोपी मोहम्मद अन्सारी आणि मृत मुलीच्या आईमध्ये खेळण्यांवरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर खुनात झाले. अन्सारीला ऑनलाईन गेम्स खेळण्याची सवय होती. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. याच तणावातून त्याने हे कृत्य केले, असं पोलिसांनी सांगितलं आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही सांगितले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.