26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…

 हेडली का पळून गेला किंवा इतर सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यावेळेस असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिली पाहिजेत” असं माधव भांडारी म्हणाले.मुंबईवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी केल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता भांडारींनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.”काल मी जे भाषण केलं त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला. जे मी बोललो नाही ते तोंडामध्ये घातले आहे. अनेक वृत्तपत्र आणि मीडियाने पण असं काही करण्यात अर्थ नव्हता. पण 26/11 हल्ला माहिती होता की नाही त्यावेळच्या सरकारला.

एका प्रेस नोटद्वारे सरकारने हल्ला होणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती दिली होती. त्यातील 85% जागेसहित माहिती होती. पाच महिने अगोदर सरकारला जर माहिती होतं हल्ला होणार आहे, तर मग ती सरकारची जबाबदारी होती हल्ला रोखण्याची. माहिती असून सुद्धा राज्य सरकारने तो हल्ला का रोखला नाही?” असा सवाल माधव भांडारी यांनी उपस्थित केला.”26/11 च्या हल्ल्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. मग आता तहव्वुर राणाला भारतात आल्यावर त्यावर चर्चा सुरू झाली त्यावेळेसच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यकर्त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी कोणाचा हात आहे असं काही बोललो नाही. हेडली का पळून गेला किंवा इतर सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यावेळेस असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिली पाहिजेत” असं माधव भांडारी म्हणाले.”राणाला भारतात आणल्यावर त्याची चौकशी सुरू झाली. ज्यावेळेस 26/11 घडलं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची ती जबाबदारी होती. त्यांनी ती उत्तरं द्यायला हवी होती. अजित पवार गृहमंत्री नव्हते. मी बोलल्याचा अर्थ कोणी काय काढायचा ते ज्याने त्याने ठरवावे. पण वस्तुस्थितीबद्दल वाद का?” असा प्रश्न भांडारींनी उपस्थित केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.