एका व्यक्तीने आपल्या चार मुलांचा गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:चाही जीव दिला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.चार चिमुकल्या पोरांचा जीव घेऊन या निर्दयी बापाने आपलंही आयुष्य संपवलं आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये ही अंगावर काटा आणणारी घटना घटना घडली आहे. येथे ३६ वर्षीय राजीव कुमारने आपल्या चार मुलांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. ही घटना रोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडल्याची माहिती आहे. राजीव कुमारने स्मृति (१२), कीर्ती (९), प्रगती (७) आणि ऋषभ (५) या आपल्या चार मुलांची हत्या केली आहे.
पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, राजीव कुमार हा मानपूर चचरी गावचा रहिवासी होता. त्याने बुधवारी रात्री धारदार शस्त्राने आपल्या चार मुलांचा गळा चिरला. ज्यामध्ये स्मृति, कीर्ती, प्रगती आणि ऋषभ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःला गळफास लावून घेतला. गुरुवारी सकाळी राजीवच्या वडील जेव्हा घरी गेले तेव्हा ही घटना उघडकीस आली. सकाळी राजीवने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याचे वडीलछतावर चढले आणि घरात गेले. तेव्हा त्यांना घरात पोरांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले.याप्रकरणी कुटुंबीयांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी राजीवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. दुखापतीमुळे तो खूप चिडचिड करायचा. त्याची पत्नी आदल्या दिवशीच माहेरी गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पोरांची हत्या केली. याघटनेमागील कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.राजीवने आपल्या मुलांची हत्या करण्यापूर्वी शस्त्राला धार लावण्यासाठी सँडपेपरचा वापर केला होता. घटनास्थळावरून शस्त्र आणि सँडपेपर जप्त करण्यात आले आहे.सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, राजीवने हे कृत्य करण्यापूर्वी खूप विचार केला होता. त्याने यासाठी विचार करुन प्लॅन केला होता. त्याने वापरलेले शस्त्र आणि इतर वस्तू त्याने तिथेच सोडल्या होत्या. ज्या पोलिसांना सापडल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच वेळी एकैच घरैतील ५ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भयान शांतता पसरली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.










