दिशा सालियान मृत्यू प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जातंय. शिंदे गटाच्या आमदाराने सांगितलं की उद्धव ठाकरे सज्जन असून त्यांचा सहभाग नाहीय. आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं की डॉक्टरांच्या अहवालानुसार दिशा सालियानच्या मृत्यूला मारहाणीचं कारण आहे, अपघात नाही. विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पाडल्याचंही त्यांनी जोडलं.दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये थेट माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलं जात आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी याचिका दाखल केलीय. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेही सहभागी असल्याचं म्हटलं होतं. मात्र अशातच यावर शिंदे गटाचे आमदार आणि महायुती सरकारमधी मंत्र्यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरें यांचा सहभाग नसल्याचं सांगितलं. कोण आहेत ते मंत्री आणि नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही, ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबद्दल बोलतायेत ते. त्याच्यामध्ये आदित्य असेल पण इतर टीम असेल. उद्धव साहेब सज्जन ग्रहस्थ आहेत, त्यांचा याच्याशी संबंध नाहीच. बाकी जे आहेत ना त्यांचा संबंध आहे आणि त्यांची चौकशी होणार आहे. ज्या पद्धतीने डॉक्टरांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये ज्या जखमा झाल्यात त्या पडल्याने होत नाहीत. मारहाण झाल्याने जखमा आहेत, त्यामुळे तिचा झालेला मृत्यू हा अपघात नाहीतर तिला झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचा दावा संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने चिरफाड करणे अपेक्षित आहे. काय चुकलं हे सांगायला पाहिजे होतं. जे नेते म्हणून घेत आहे त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर केला का? पोडियम वर जाऊन वेळ घालवून घेतला. त्यावर तुम्हाला भाष्य करायचा अधिकार तुम्हाला उरलेला नाही. नागपूर दंगल कुणी भडकावली, जबाबदार कोण हे बोलायला पाहिजे होते. कोरटकर कोणत्या पक्षाचा हे बोला. जेव्हा स्वतःवर येत तेव्हा असं वागतात. आता औरंगजेब, भिडे गुरूजीवर बोलतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पाडायला विरोधी पक्षाने चांगली मदत केल्याचं म्हणत शिरसाटांनी टोला लगावला.
खिशात आणा आहे की नाही ते जनतेने बघितले. कोस्टल रोड सुरू झाले, ज्यांच्यामुळे तुमची सत्ता गेली ती लाडकी बहिण योजना सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने आम्हाला पक्षाला मान्यता दिली. त्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे. लोकशाही मानत असाल तर पक्ष आमचा आहे आणि गट तुमचा हे कोर्टाने स्पष्ट केल्याचं शिरसाट म्हणाले.










