एक फूटाचा टेबल ठरला मृत्यूचा जबडा! खतरनाक व्हिलनच्या ५ वर्षांच्या लेकराचा गेलेला जीव, शेतातच केले अंत्यसंस्कार.

बॉलिवूडमध्ये कलाकार खलनायकाची भूमिका साकारत असले तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार झालेले असतात.मुंबई- आज सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश राज यांचा वाढदिवस आहे आणि ते ६० वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म २६ मार्च १९६५ रोजी बंगळुरू येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण येथूनच पूर्ण केले.प्रकाश राज यांनी तमिळ दिग्दर्शक के. बालचंदरच्या सल्ल्यानुसार आपले आडनाव बदलून ‘राज’ केले. प्रकाश राज हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ६ नंदी पुरस्कार, ८ तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि ५ फिल्मफेअर पुरस्कार साऊथ यांचा समावेश आहे.प्रकाश राज यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ते बऱ्याच खाचखळग्यांनी भरलेले होते. १९९४ मध्ये त्यांनी तमिळ अभिनेत्री ललिता कुमारीशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली, दोन मुली मेघना आणि पूजा व एक मुलगा सिद्धू. पण वयाच्या ५ व्या वर्षी त्यांचा मुलगा मरण पावला. तेव्हा त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. याबाबत अभिनेत्याने सांगितले होते की त्याने त्याच्या मुलाचा मृतदेह त्यांच्या शेतात जाळले होते. ते म्हणाले, ‘बऱ्याचदा मी तिथे जाऊन बसतो आणि मला जाणवते की मी किती असहाय्य आहे. आयुष्यात कसलाच भरोसा नाही, ते खूप छोटे आहे.

निसर्गासमोर तुम्ही खूप कमकुवत आहात. मला माझ्या मुली खूप आवडतात पण तरीही मला माझ्या मुलाची खूप आठवण येते.टेबलावरून पडल्यानंतर हे घडले.२००४ मध्ये त्यांच्या मुलाच्या निधनानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलले हे प्रकाश राज यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, ‘तो फक्त ५ वर्षांचा होता आणि एक फूट उंच टेबलावर पतंग उडवत होता आणि अचानक तो त्यावरून पडला. काही महिन्यांनंतर, त्याला झटके येऊ लागले आणि त्यानंतर तो मरण पावला. कारण काय होते हे कोणालाही समजले नाही. त्याचा मृत्यू माझ्यासाठी सर्व दुःखापेक्षा मोठा होता. आता, मी आयुष्याला हलके घेत नाही.

मुलाच्या निधनानंतर प्रकाश राज आणि त्यांच्या पत्नीमधील नातेही बदलले. दोघांनीही त्यांचे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले आणि २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, २०१० मध्ये, त्यांनी त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या बॉलिवूड कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केले. प्रकाश यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता तेव्हा ते पोनीला भेटले, ‘पोनी माझ्या एका चित्रपटाची कोरिओग्राफर होती. मी माझ्या आईशी आणि माझ्या मुलींशी याबद्दल बोललो आणि त्यांना सांगितले की मला पुन्हा लग्न करायचे आहे पण पोनीने माझ्या मुलींसोबत वेळ घालवावा अशी माझी इच्छा होती. पोनी माझ्या पहिल्या पत्नी आणि मुलींना भेटली आणि त्यांनी सांगितले, बाबा, तुम्ही पुन्हा लग्न करायला हवे. यानंतर प्रकाश आणि पोनी यांचे २४ ऑगस्ट २०१० रोजी लग्न झाले आणि दोघांनाही वेदांत नावाचा मुलगा आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.