बीडमध्ये संतोष देशमुख हत्येचा प्रकार चालू असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ग्रामस्थांनी आरोप केला की, पोलिसांनी देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधातून दाखवले. तपासात त्रुटी असल्याचं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली नाही. यावर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता जवळपास ७० दिवस होत आलेत. मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे तर इतर आरोपींना शिक्षा झालेली नाही. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळ यांनी देशमुखांच्या परिवाराची भेट घेतली. या भेटीदरम्यान मस्साजोग गावच्या ग्रामस्थांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यावेळी मृतदेह आणला जात होता तेव्हा मी केज पोलीस स्टेशनला होतो. हा जे काही झालेला प्रकार आहे त्या दिवशी मला शेवटचा फोन आला की, अण्णांना लागलेलं आहे, हॉस्पिटलला न्यायचं आहे असं माझी माणसं मला सांगत होती. ही माहिती मीडियापर्यंत कशी पोहोचली नाही याचं आश्चर्य वाटत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगत होतो त्यांनी ही गोष्टच कोणाला कळू दिली नाही. त्यानंतर अधिकारीसुद्धा बदलले गेले, हा खूप प्रकार असल्यामुळे ही गोष्ट थांबलीगाडी कळंबच्या दिशेने निघाली होती, त्यामागे मस्साजोग गावामधील गाड्याही होत्या. कलंबच्या दिशेने का घेऊन चाललेत? केजला पोलीस स्टेशन आहे, उपजिल्हा रूग्णालय आहे. दुसरं कोणी सांगितलं असतं तर मलाही विश्वास बसला नसता. माझ्या घरातील आणि सोबतची लोकं आहेत त्यांनी हा किस्सा इथेच सांगितला होता. हा कसाकाय समोर आली नाही माहित नाही. सुरेश धस यांनी सभागृहात हे प्रकरण मांडलं होतं ते आठवा. एक महिला तयार ठेवण्यात आली होती.










