अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः अनदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लाग करा, अशी आग्रही मागणी राज्यातील शिक्षक समन्वय संघाकडून केली जात आहे, या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाकडून १६ व १७ रोजी मुंबईंच्या आझाद मैदानावर धरणे आदोलन करण्यात येणार आहे.

करण्यासाठी नव्या संधी व नोकऱ्या कराव्या लागत आहेत. २५ फेब्रुवारी रोजीशालेय शिक्षण व क्रीडा विभागाने, राज्यातील १०० टक्के अनदानित खासगी शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयूष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली वैद्यकीय खर्चाचे लाभ देण्याबाबत निर्णय जारी करण्यात आला. यामध्ये अशतः अन्दानित शिक्षकांचा समावेश न केल्याने तीत्र शब्दात नाराजीचे सूर उमटत आहेत.
अंशतः अनुदानित शिक्षकांनी, निवृत्ती नंतर किमान पेन्शन योजना लागू करा अशी मागणी केली जात आहे . अनुदानित शिक्षकांची डी.सी.पी.एस.एन.पी.एस.ची खाती अद्याप सरु करण्यात आलेली नाहीत, पण अंशतः अनुदानीत सुरु करतांना व प्रत्येक वाढीव टप्पा देताना सदर योजनांमध्ये ” सामील होऊ असे शिक्षकांकडून हमी पत्र घेण्यात आले होते, परंतू यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. २००१ पासून राज्यात विना अनुदानित धोरण लागू झाले.२००१ पासून विनावेतनाची, विनाअनुदानित अशी सुमारे २० वर्षे अलीकडील अंशतः अनुदानितकडील ५ ते ६ वर्षे अशी यामुळे राज्यातील सुमारे ६५ हजार शिक्षक बेजार झाले आहेत. सेवेत असताना फारस काही मिळालं नाही आणि निवृत्ती नंतर ही काहीच नाही यामुळ धर्म संकटात सापडलल्या अनुदानित शिक्षक आजारी पडत नाहीत ‘का ?. त्यांचे नातेवाइक आजारी पडत नाहीत का ?, असा सवाल शिक्षक विचारत आहेत, अंशतः अनुदानित शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळावं, अंशतः अनुदानित शिक्षकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्या,त्रुटी पूर्तता शाळांना वाढीव टप्पा मिळावा या मागण्या संदर्भात आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड मार्फत महाराष्ट्राचे.मुख्यमंत्री. देवेंद्र.फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव, शिक्षण सचिव, यांना देण्यात आले आहे

यावेळी प्रा कैलाश खानसोळे, प्रा गोविंद वाघमारे, श्रीहरी खुर्दामोजे, प्रा दादाराव नालंदे, प्रा. सुदर्शन फाजगे,अजित शिंदे, प्रा. कैलाश कपाटे, प्रा. गंगाधर जोंधळे, प्रा.कैलास जगताप, नागनाथ हिप्परगेकर, अविनाश जाधव आदि उपस्थित होते.








