पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनावरण.

पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनावरण

जळगाव,(प्रतिनिधी)- लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रश्नावर जनजागृती व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली २८ जुलै रोजी सुरु होतं असलेल्या पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे अनावरण जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या शुभहस्ते जैन हिल येथे करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघांचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, जैन उद्योग समूहाचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी,इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, ऍड. दिपक सपकाळे,जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, महानगराध्यक्ष योगेश चौधरी,संघटक गौरव राणे, चेतन पाटील, प्रथमेश मराठे यांची उपस्थिती होती. दरम्यान पत्रकार संवाद यात्रेच्या उद्देशाबाबत व पत्रकार, वृत्तपत्रांच्या मागण्यासंदर्भात अशोक जैन यांना प्रविण सपकाळे यांनी माहिती दिली.

पत्रकार संवाद यात्रेला दीक्षाभूमी नागपूर येथून सुरवात होतं असून जळगावात ३१ जुलै रोजी दुपारी दोन वाजता यात्रा पोहचणार आहे. दरम्यान आकाशवाणी चौकात यात्रेचे भव्य स्वागत, त्यानंतर पत्रकारांशी संवाद होणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी मोठया संख्येने पत्रकार संवाद यात्रेत सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी सामील व्हावे असे आवाहन पत्रकार संघांचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.

संवाद ही शांततेच्या मार्गाने प्रामाणिक,सुरक्षीत चर्चा आहे. ज्यामुळे लोकांच्या समस्या मांडणाऱ्या, पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांच्या वेदना, समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ”संवाद ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते. पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार संवाद यात्रा निघत आहे. लोकशाहीत माध्यम व्यवस्था सक्षम राहिली तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहील म्हणूच या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रविण सपकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.

Related Posts

जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक!

जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक! ​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेतील विविध समस्या आणि अनियमिततेमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अखिल…

भुसावळ येथे संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यक्रम; निलकंठ तायडे रावेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त.

भुसावळ येथे संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यक्रम; निलकंठ तायडे रावेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त. भुसावळ (जि. जळगाव) : संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ येथे कार्यक्रमाचे आयोजन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..