पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनावरण.

पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनावरण

जळगाव,(प्रतिनिधी)- लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रश्नावर जनजागृती व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली २८ जुलै रोजी सुरु होतं असलेल्या पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे अनावरण जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या शुभहस्ते जैन हिल येथे करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघांचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, जैन उद्योग समूहाचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी,इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, ऍड. दिपक सपकाळे,जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, महानगराध्यक्ष योगेश चौधरी,संघटक गौरव राणे, चेतन पाटील, प्रथमेश मराठे यांची उपस्थिती होती. दरम्यान पत्रकार संवाद यात्रेच्या उद्देशाबाबत व पत्रकार, वृत्तपत्रांच्या मागण्यासंदर्भात अशोक जैन यांना प्रविण सपकाळे यांनी माहिती दिली.

पत्रकार संवाद यात्रेला दीक्षाभूमी नागपूर येथून सुरवात होतं असून जळगावात ३१ जुलै रोजी दुपारी दोन वाजता यात्रा पोहचणार आहे. दरम्यान आकाशवाणी चौकात यात्रेचे भव्य स्वागत, त्यानंतर पत्रकारांशी संवाद होणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी मोठया संख्येने पत्रकार संवाद यात्रेत सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी सामील व्हावे असे आवाहन पत्रकार संघांचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.

संवाद ही शांततेच्या मार्गाने प्रामाणिक,सुरक्षीत चर्चा आहे. ज्यामुळे लोकांच्या समस्या मांडणाऱ्या, पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांच्या वेदना, समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ”संवाद ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते. पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार संवाद यात्रा निघत आहे. लोकशाहीत माध्यम व्यवस्था सक्षम राहिली तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहील म्हणूच या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रविण सपकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.

Related Posts

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. पहलगाम परिसरात पर्यटकांची कायम गर्दी असते. दरवर्षी लाखो पर्यटक या भागाला भेट देतात.श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा…

लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

 जालना जिल्ह्यातील फत्तेपूर येथे एका १८ वर्षीय अविवाहित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल आघाम या तरुणाने लग्नाची धमकी दिल्याने तिने त्याच्या घरी आत्महत्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

अँटिलिया वक्फची संपत्ती? मुकेश अंबानींवर जमीन हडपल्याचे आरोप; या व्यक्तीने बनवलेले अनाथाश्रम.

दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !

दोन दुचाकीची जबर धडक : महिला जखमी !