तुमचे तसे मत बनले पाहिजे. जे मत कोणी चोर, हरामखोर खरेदी करू शकणार नाही. शिवराम पाटील.

मन बनवा.मत बनवा.जे विक्री होणार नाही! शिवराम पाटील

जळगाव शहरातील रस्ते बनवण्यासाठी आपण महानगरपालिका व राज्य सरकारला डबल कल देतो. अगदी बळजबरीने कर वसुली करतात. गडकरी तर फास्ट स्टॅग नाही लावला तर डबल टोल टॅक्स घेतात. गाडी घेतांना रोड टॅक्स भरला ना! मग पुन्हा टोल टॅक्स का? तो सुद्धा डबल? जनतेला जिथे लुटता येईल तितके गडकरी लुटत आहेत. हा तर अंधी बहिरी जनतेवर बलात्कार आहे. ही दादागिरी आहे कि सत्तेची मुजोरी? लोक सहन करतात.कारण त्यांना पोलिस संरक्षण असते. नाहीतर लोकांनी मंत्री ला ठोकून काढले असते. इतकी दादागिरी करूनही जळगाव शहरातील हायवे दोनच वर्षांत उखडला. म्हणे पावसाळ्याचे पाणी मुळे उखडला. का रे लबाडांनो! जळगाव शहरात पाऊस पडतो, हे माहीत नाही का? तुम्ही काय मामाच्या दुकानातील दारू पिऊन काम करतात का? हे असे बोलण्याचे,विचारण्याचे धाडस गुलाबराव करणार नाहीत. तेच नशेत असतात.किंवा महाजन करीत नाहीत. तेच शिकार करण्यात असतात.पिस्तूल घेऊन. दुसरा तिसरा कोण आमदार आहे जळगाव जिल्ह्यात? जो कोणी गडकरी, मोदी ,फडणवीस, शहा यांना प्रश्न करील? पोते कुरतडणारे उंदीर ! हे धाडस आम्ही करतो. हरामखोरांनो, कर घेतात तर रस्ते तरी चांगले बनवा. बनवता तर तुमचे कमीशन आधीच देतो. पन्नास टक्के तर चांगले बनवा. आम्ही गोंधळ करतो तर बोकडाचे रक्त असुरांना देतो.तसे तुम्हाला असुरांना, चोरांना कमीशन देतो. असुर,दानव, राक्षस तरी रक्त पिऊन चांगले काम करतात. तुम्ही तर कमीशन घेऊनही चांगले काम करीत नाहीत. म्हणून तुम्हाला जंगलात पिटाळून लावले पाहिजे. जसे शिंदे बरोबर चाळीस असुर पळाले होते, आसामच्या दाट जंगलात. कामाक्षी देवीची पुजा करायला. शेंदूर भरायला. जे आता महाराष्ट्राच्या छाताडावर बसून जनतेच्या हक्काची तिजोरी लुटत आहेत.


नागरिकांनो, महात्मा गांधी अहिंसा शिकवायचे. पण १८४२ मधे त्यांनाही राग आला होता इंग्रजांचा. म्हणाले,” करो या मरो. डू ऑर डाय! मला इंग्रज सरकार अटक करून जेलमध्ये टाकणार. तर तुम्ही नेतृत्व हिन होणार. अशा वेळी स्वतः गांधीजी बना. आपले नेतृत्व आपणच करा.”आणि झाले तसेच. तेंव्हा इंग्रजांनी ठरवले.आता भारतावर राज्य करणे कठीण आहे. गांधी बाबाने सर्वांना आपल्या विरोधात चेतवले आहे. तसेच आज मी जळगाव चे लोकांना, जिल्ह्यातील लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना चेतवत आहे.जागृत करीत आहे. नागरिकांनो,उठा , जागे व्हा. उघडा डोळे. बघा नीट. तुमचा आमदार करोडपती कसा झाला? तुमचा पालकमंत्री अब्जोपती कसा झाला? आपला मुख्यमंत्री इतका कुबेर कसा झाला?एका एकाला पन्नास खोके? मंत्री आहेत कि चाचे? मी म्हणतो,चोरी केली आहे, यांनी!आपल्या विकासाच्या निधीतून. नागरिकांनो, याला तुमची सुस्ती कारणीभूत आहे. तुमची भीती कारणीभूत आहे. तुम्ही घाबरतात या चोरांना. मी नाही घाबरत‌. मी तर खडसेंना अंगणात जाऊन दरडावले. सांगा,तुमचे संपर्क कार्यालय कुठे आहे? मी तर थोरातांचा पाठलाग केला होता, संगमनेर पर्यंत. रात्री अंधारात जळगाव ला यायचे. मी विखेंना खडसावून आलो, तुम्ही जळगाव ला रेतीची वसुली करायला येतात‌. मी राज्यपालांना जाऊन सांगितले कि खडसेंना विधानपरिषदेत घेऊ नका. मी मुख्यमंत्री शिंदेंना घरी जाऊन सांगितले, गुलाबराव ला मंत्री बनवू नका. मी सांगितले भुसेंना, पोषण आहारातील दलाली मिळाली असेल तर निघा येथून. आता मी सांगतो पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंना. चोरांना विधानसभेची उमेदवारी देऊ नका. इडीच्या धाकाने भाजपात पळून जातील. चोर तो चोरच!चोराला काय नितीमत्ता असते का? पवार, ठाकरे आणि दाऊद ही सारखेच दिसतात यांना!

मी जे बोलतो,लिहीतो हे पवार साहेब, उद्धव ठाकरे यांना माहिती आहे.फडणवीस ,मोदी ,शहांना माहिती आहे.राहुल गांधींना माहिती आहे. पण उघड उघड बोलत नाहीत. कारण भ्रष्टाचार करणे हाच मुख्य हेतू असेल तर हे जनतेपासून लपवावे लागते. मला नाही वाटत कि, हे लपवले पाहिजे. मला नाही वाटत कि मतदारांना फसवले पाहिजे.जर लपवत असाल,फसवत असाल तर कितीही मंदिरे बांधा , काहीच उपयोग नाही. एकदा अयोध्यातील लोक जागृत होणारच.मोदींना तेथे हरवणारच. ये बंदा रामका नाम लेकर अपना घर उजाड रहा है! अशीच वेळ आता जळगाव मधे आली आहे.अशीच वेळ आता महाराष्ट्रात आली आहे. आता मतदारांनी चोर ओळखला पाहिजे.संध्याकाळी क्वार्टर साठी पैसे दिले तरीही ओळखला पाहिजे.मतासाठी पांचशे दिले तरीही ओळखला पाहिजे. चोर समजला तर निवडणुकीत हाणून पाडला पाहिजे.
आता जळगाव शहर व जिल्ह्यातील उमेदवार शोधासाठी अनिल देशमुख, जयंत पाटील यांचा दौरा चालू आहे.ठाकरे सुद्धा येतील.बावनकुळे येतील.फडणवीस येतील. शोधतील कोई हैं मालवाला? जो हमे भी देगा और मतदाताओको भी देगा! कोई है रेती वाला, दारूवाला, डान्सबार वाला, सट्टा वाला, पिस्तूल वाला? जो जलगांव में हमारी पंच तारा हॉटेल मे पंचामृत से पंच कर्म खातीरदारी करेगा?


जळगाव चे नागरिक बांधवांनो,या लोकांची ही सैतानी ख्वाईस,हैवानी करतूत आपण उघड्या डोळ्यांनी पाहात आहात. इंग्रजांनी जितका हिंदुस्थान लुटला नसेल त्या पेक्षा जास्त आपले जळगाव लुटले आहेत. जळगांव म्हणजे, तुम्हाला लुटले आहेत.ओरबाळले आहेत. हे कोण थांबवणार? हे आम्ही थांबवणार. महाराष्ट्र जागृत जनमंच थांबवणार. फक्त साथ तुमची हवी आहे. तुमचे तसे मन बनले पाहिजे. तुमचे तसे मत बनले पाहिजे. जे मत कोणी चोर, हरामखोर खरेदी करू शकणार नाही.

शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

  • Related Posts

    महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचा आढावा, शिंदे गटाचा हायक्लास परफॉर्मन्स .

    महायुती सरकारमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये सर्वात चांगली कामगिरी कोणी केली, याचा अहवाल लवकरच समोर येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या सरकारची सूत्रं…

    आधी दरड कोसळली, मग पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा थयथयाट, महाराष्ट्रातील दाम्पत्याचा थरारक प्रवास.

     22 एप्रिलला पहलगामवरून ते परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी पहलगाममध्ये अचानक दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर हल्ला केला.पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दोन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचा आढावा, शिंदे गटाचा हायक्लास परफॉर्मन्स .

    महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचा आढावा, शिंदे गटाचा हायक्लास परफॉर्मन्स .

    आधी दरड कोसळली, मग पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा थयथयाट, महाराष्ट्रातील दाम्पत्याचा थरारक प्रवास.

    आधी दरड कोसळली, मग पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा थयथयाट, महाराष्ट्रातील दाम्पत्याचा थरारक प्रवास.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडून चूक मान्य? घटनास्थळी सुरक्षा का नव्हती, समोर आलं मोठं कारण.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडून चूक मान्य? घटनास्थळी सुरक्षा का नव्हती, समोर आलं मोठं कारण.

    सोलापुरातील प्रसूतीगृहातून 14 तासांच्या मुलीला चोरण्याचा प्रयत्न, आईने आरडाओरडा केला अन् डाव फसला, नेमकं काय घडलं.

    सोलापुरातील प्रसूतीगृहातून 14 तासांच्या मुलीला चोरण्याचा प्रयत्न, आईने आरडाओरडा केला अन् डाव फसला, नेमकं काय घडलं.