जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

विषेश प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर नायगाव( बा.)नांदेड जिल्हा प्रतिनिधी सुभाष सूर्यवंशी नरसीकर.एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव यांच्या वतीने जिल्हा पातळीवरील कै. अमृतराव पाटील चव्हाण वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे सलग सदतीसावे वर्ष होते. स्पर्धेचा विषय हा पंडित नेहरूचे विचार व आजचा भारत होता. जिल्ह्यातील सोळा नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पांचाळ व्ही.एस, प्रा. डॉ.बाळू दुगडुमवार, प्रा. खानपट्टे एम. एम.हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद जोनकल्ले यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार वसंत माने यांनी मानले. स्पर्धेत प्रथम क्रमांक 5100 रु व ट्रॉफी अष्टेकर संचिता सुभाष,महात्मा फुले हायस्कुल बाबानगर, नांदेड, द्वितीय क्रमांक 4100 रु व ट्रॉफी शेख नौशीन अ. बारी, जनता हायस्कुल नायगाव, तृतीय क्रमांक 3100 रु व ट्रॉफी कु. जमदडे प्राजक्ता नीलकंठ, जवाहर लाल नेहरू विद्यालय बरबडा तर उत्तेजनार्थ बक्षीस 2100 रु. व ट्रॉफी कु. जाधव विद्या विक्रम, कै मोहनराव देशमुख विद्यालय सुजलेगाव, यांनी पारितोषिक प्राप्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रा. डॉ.राजेंद्र इंगळे गुरुवर्य वसंत माने, प्रा. पी. डी. जाधव,प्रा.माधव बावलगावे, प्रा. गजानन शिंपाळे,सय्यद वसीम, नागप्पा दुड्डे, डॉ.मधुसूदन इंगळे,विजय जाधव,प्रा. संगमेश्वर शिंदे,श्रीपाद ढगे,आनंद गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब शिंदे, उप प्राचार्य महादेव सोमावार, पर्यवेक्षक उत्तम पाटील ,बसवंत रिठेवाड,पर्यवेक्षक बी.आर. शेख आणि स्पर्धेच्या परीक्षकांच्या हस्ते वितरित करण्यात आले.याप्रसंगी मोठ्यासंख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.







