बीडच्या मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक करण्यासाठी विविध स्तरावर मागण्या होत आहेत. अंजली दमानिया यांनी आरोप करत कारवाईसाठी उपोषण केले. अंजली दमानियाने धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर आता गंभीर आरोप केले आहेत.बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप हे सातत्याने केली जात आहेत. काही आरोपींना अटकही करण्यात आलीये. एकजण अजूनही फरार आहे. आरोपींमध्ये वाढ होऊ शकते, असे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटले. आरोपींना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी सातत्याने केली जातंय. अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन देखील केले जातंय. बीडमध्ये काही दिवसांपूर्वीच मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला राज्यातील अनेक मोठे नेते दाखल झाली होती.
अंजली दमानिया यांनीही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी वाल्मिक कराडवर त्यांनी आरोप केले. यासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील केले. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक होणार नाही, तोपर्यंत आपण बीडमधून हलणार नसल्याची भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली.आता नुकताच अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्ये हे आपला मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीमध्ये वाल्मिक कराड हा पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करत होता. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून धनंजय आणि पंकजा एकत्र आहेत. दोघांचेही कार्यकर्ते माझा मानसिक छळ करत आहेत.नेमक्या कशाप्रकारचा माझा छळ सुरू आहे आणि मला कशापद्धतीने त्रास दिला जातोय. हे मी सविस्तर सांगेल. मी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार करणार आहे. त्यांना मी वेळ मागितला आहे. मी पत्रकार परिषद घेत याबद्दल सविस्तर माहिती देणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले होते. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम अंजली दमानिया करत असल्याचा आरोप करत पोलिस स्टेशनसमोर आंदोलनही बीडमध्ये अंजली दमानिया विरोधात करण्यात आले होते.











