रस्त्यांवर शासनामार्फत वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेकरीता ‘अती घाई संकटात नेई, आवरा वेगाला सावरा जीवाला’ अशा आशयाचे फलक लावले जातात. परंतु बऱ्याचदा, आवेगामध्ये वाहनचालकांकडून या सूचनांचे उल्लंघन होते. वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे दोन मित्रांचा भीषण अपघात झाला आहे. ज्यात एकाचा मृत्यु झाला असून, एकजण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहे. प्रति तास २१० किलोमीटर प्रति वेगाने धावणाऱ्या कारचे मागचे टायर फुटल्यामुळे कार उलटल्याने एकजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात धुळे सोलापूर रोडवर कन्नड जवळ शाकंभरी जिनिंग येथे बुधवार दिनांक २ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्त्यांवर शासनामार्फत वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेकरीता ‘अती घाई संकटात नेई, आवरा वेगाला सावरा जीवाला’ अशा आशयाचे फलक लावले जातात. परंतु बऱ्याचदा, आवेगामध्ये वाहनचालकांकडून या सूचनांचे उल्लंघन होते. आणि शेवटी अपघात होऊन प्राणावर बेतते. असाच, वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे दोन मित्रांचा भीषण अपघात झाला आहे. ज्यात एकाचा मृत्यु झाला असून, एकजण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहे. या प्रकरणी मिळालेली माहिती अशी, सुनील विजय जाधव वय २३ वर्षे राहणार, म्हाडा कॉलनी कन्नड. या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर मयूर ज्ञानेश्वर वाळुंजे वय २६ वर्ष. हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जाधव आणि मयूर वाळुंजे हे दोघे मका खरेदी करण्याचा व्यवसाय करत होते. दोघे जिवलग मित्र असल्यामुळे कायम सोबत राहत होते.









