वाल्मिक कराडच्या सुनावणीवेळी केज कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी केला लाठीचार्ज,

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडवर यानंतर गंभीर आरोप केले गेले. 22 दिवसानंतर वाल्मिक कराड शरण आला. अगोदर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर पुण्यातून केजमध्ये रात्री उशीरा कराडला आणण्यात आले. यावेळी मोठ्या घडामोडी या बघायला मिळाल्या. बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. हेच नाहीतर गंभीर आरोपही करण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध हा घेतला जातोय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड याच्याही शोधात पोलिस होते. कराडने मंगळवारी साधारण अकराच्या दरम्यान आत्मसर्मपण केले. त्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला.

आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे कराडने आपल्या व्हिडीओत म्हटले. रात्री उशिरा केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आले. पुण्यात आत्मसर्मपण केल्यानंतर संध्याकाळी कराडला बीडला आणले गेले. मात्र, यावेळी केज न्यायालयाच्या बाहेर मोठा राडा झाल्याचे बघायला मिळाले. वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. न्यायालयाबाहेरील जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. मोठ्या संख्येने यावेळी पोलीस बंदोबस्त हा बघायला मिळाला. वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडी मुख्यालयात पोहोचणार असल्याचे कळाल्यानंतरही कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. यानंतर काही वेळात वाल्मिक कराड सीआयडीच्या मुख्यालयात पोहोचला. त्यानंतर रात्री उशीरा बीडमध्ये कराडला नेण्यात आले.कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, वाल्मिक कराड यांच्यावर होत असलेले सर्व आरोप हे खोटे असून फसवले जातंय. दुसरीकडे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून केली जातंय. बीडमध्ये काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येनतंर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात राज्यातील अनेक मोठे नेते दाखल झाले होते. 22 दिवसांनंतर कराड शरण आला. आता याप्रकरणी काय खुलासे होतात, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..