दिवसाढवळ्या चाकूने भोसकलं, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, गळ्यावर चाकूहल्ला असे जीवघेणे हल्ले शहरात वाढले असून गेल्या सहा दिवसात सहा हत्येच्या घटनांनी नागपूर जिल्हा हादरला आहे. राज्यात गुन्हेगारीनं कळस गाठला असून मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या,परळीत गोळीबार,अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असतानाच नागपूर शहर हत्या शहरातून घडलेल्या सहा खुनांच्या घटनां संपूर्ण शहर हादरले आहे. रविवारी एकाच दिवशी हत्येच्या दोन घटना घडल्याने शहरासह परिसरात भीतीचं वातावरण आहे. वैयक्तीक कारणासह किरकोळ कारणांमधून या हत्या झाल्याचं उघड झालं आहे. दिवसाढवळ्या चाकूने भोसकलं, पैशांची मागणी करत दगडाने ठेचून खून, गळ्यावर चाकूहल्ला असे जीवघेणे हल्ले शहरात वाढले असून गेल्या सहा दिवसात सहा हत्येच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. दिवसाढवळ्या चाकूहल्ले, जीवघेणे हल्ले करत खून होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे राहत आहे.










