जेव्हा मनमोहन सिंग यांच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळाली होती; तो किस्सा तुम्हाला माहित आहे का?

 मनमोहन सिंग यांच्या जाण्याने एका सक्षम नेतृत्वाला आणि अभ्यासू राजकारण्याला मुकला आहे. त्यांनी देशाला दिलेल्या उल्लेखनीय अशा योगदानात त्यांचे एक अमुल्य योगदान म्हणजे देशातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळाली ती दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात.भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळातील प्रकृती अस्वास्थामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने देश एका सक्षम नेतृत्वाला आणि अभ्यासू राजकारण्याला मुकला आहे. त्यांनी देशाला दिलेल्या उल्लेखनीय अशा योगदानात त्यांचे एक अमुल्य योगदान म्हणजेदेशातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी मिळाली ती दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात. या कर्जमाफीचे सर्वप्रथम संकेत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे स्वत: डॉ. मनमोहनसिंग यांनी दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच केंद्रीय अर्थसंकल्पात ६० हजार कोटी रुपयांच्या या कर्जमाफीची घोषणा आणि नंतर अंमलबजावणीही झाली होती. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

२००८ मध्ये केंद्रातील काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये डॉ. सिंग पंतप्रधान होते. तर ज्येष्ठ नेते शरद पवार कृषीमंत्री होते. त्यावेळी शेतकऱ्यांना सर्वप्रथम कर्जमाफी देण्यात आली. ही कर्जमाफी का आणि कशी दिली, याची सविस्तर माहिती पवार आपल्या भाषणांतून अनेकदा देत असतात. मात्र, या कर्जमाफीचे संकेत स्वत: डॉ. सिंग यांनी लोणी (ता. राहाता) येथील आपल्या भाषणातून दिले होते. शिर्डीचे तत्कालीन खासदार, दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. ८ फेब्रुवारी २००८ रोजी प्रवरानगर येथे अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राज्यपाल एस. एम. कृष्णा, कृषीमंत्री शरद पवार, मंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सिंग यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना सरकार आखत असल्याचे सिंगांनी सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा झाली.डॉ. सिंग यांच्या निधनानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. विखे म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाचे नेतृत्‍व करताना अर्थव्‍यवस्‍थेला महत्‍व दिले होते. देशासाठी त्‍यांनी दिलेल्‍या योगदानाचे स्‍मरण हे सदैव राहील. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील मैत्रीचा दुवा हा फक्त ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचा होता. प्रवरानगर येथे त्यांनी दिलेली भेट सदैव स्मरणात राहणारी आहे. खासदार विखे विनंतीवरून प्रवरानगरला अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या पुतळ्याचे, टपाल तिकीटाचे अनावरण आणि सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्‍ताने ते प्रवरानगरला आले होते. त्यानंतर महाराष्ट्राने सन २०१० आणि २०११ या वर्षात तृणधान्य उत्पादनात केलेल्या विशेष कामगिरी केली होती. पहिल्या दहा राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. त्याबद्दल डॉ. सिंग यांच्या उपस्थितीत राज्याचा सन्मान झाला होता. तो स्वीकारण्याची संधी मला मिळाली होती, अशी आठवण मंत्री विखे पाटील यांनी सांगितली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..