गृह राज्यमंत्रिपद हाती, योगेश कदमांनी फटक्यात निकाल लावला, तिघे अटकेत, रॅकेटचं कंबरडं मोडलं

युद्धपातळीवर तपास करून तीन जणांना अटक केली आहे. त्यामुळे गोहत्या प्रकरणातील रॅकेट उघडकीस आले आहे. खेडमध्ये गोवंश हत्येचे काही पुरावे सापडल्यानंतर वातावरण तापलं होतं. सकल हिंदू संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही पोलिसांना कोणतही हयगय न करता तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेड येथे तातडीने भेट देत या प्रकरणात माहिती घेऊन तपासाचे आदेश दिले. यानंतर तिघा जणांना अटक करण्यात आली असून रॅकेट उघडकीस आले आहे.  रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि पोलीस उपविभाग अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी युद्धपातळीवर तपास करून तीन जणांना अटक केली आहे. त्यामुळे गोहत्या प्रकरणातील रॅकेट उघडकीस आले आहे. चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी या प्रकरणातील तिघा जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मांस व एक जिवंत बैल हस्तगत करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.खेड तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात रविवार दि २२ रोजी गोवंशाचे अवशेष आढळल्यानंतर हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. अशातच पुन्हा सोमवार दि २३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देवणे पुल येथेच नदी पात्रात गोवंशाचे अवशेष मिळाल्याने वातावरण तापले होते.

खेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गोवंश हत्या होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी दुपारी खेड शहरानजीकच्या नारिंगी नदीवरील देवणे पुलाखाली गोवंशाची हत्या करून त्याचे अवशेष छिन्न विच्छिन्न अवस्थेत टाकलेले काही नागरिकांना दिसले. हा संतापजनक प्रकार कानोकानी पसरून घटनास्थळी गर्दी जमली होती. यावेळी घटनास्थळी जमलेला जमाव संतप्त झालेला असतानाच रस्त्यावरून एका रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने जमावाला उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे प्रक्षोभक झालेल्या जमावाने ती रिक्षा अडवली. परंतु त्या रिक्षामध्ये त्या प्रवाशांसोबत दोन लहान मुले असल्याने पोलीसांनी मध्यस्थी केली आणि अडवलेली ही रिक्षा जमावाने सोडून दिली. परंतु तरी देखील जमावाने रिक्षाची मागील बाजूची काच फोडून टाकली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले होते. रविवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी शहरातून रुट मार्च करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आणखी गोवंशाचे अवयव देवणे पुल परिसरातील नारिंगी नदी पात्रात आढळून आले. त्यामुळे घटनास्थळी पुन्हा लोक जमा झाले होते. संतप्त जमावाकडून कोणतीही आगळीक होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनास्थळी जादा पोलिस कुमक मागवली होती. त्यामुळे त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी अज्ञातस्थळी बैठक घेऊन दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वीसपेक्षा जास्त दुचाकीवर स्वार तरुणांनी शहरातून फेरी काढून दुकानदार व व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. त्यानंतर सकल हिंदू समाज खेडच्या नावे एक पत्रक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले असून त्यामध्ये मंगळवार २४ रोजी सर्व व्यवहार बंद घेऊन सर्व धर्मियांनी सकाळी १० वाजता शहरातील तीनबत्ती नाका येथे गोवंश हत्येचा निषेध करण्यासाठी जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील खेडमध्ये भेट दिली आहे.

या प्रकरणी सायंकाळी खेडचे प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेच्या संदर्भात माहिती दिली. यावेळी श्री राजमाने म्हणाले, खेडमध्ये शशिकांत दांडेकर या शेतकऱ्याची गाय चोरीला गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र त्यांनी तिचा शोध घेतला असता नारिंगी नदी किनारी देवणे भागात त्यांना गोवंशाचे अवशेष आढळले. त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून चार तपास पथके नेमले होते.पोलिसांना चोवीस तासांतच गोवंश चोरी करणारा एक इसम, त्याची वाहतूक करणारा एक इसम व त्याची कत्तल करणारा एक इसम सापडला आहे. त्यापैकी एकाच्या घरी खेड शहरातच दहा किलो मास देखील सापडले असून शहर जवळील गावात चोरी करून लपवून ठेवलेला एक बैल देखील हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिस कोणालाही सोडणार नाहीत. कठोर कारवाई केली जाईल. परंतु नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सोशल मीडियातून अज्ञात व्यक्तींकडून खेड बंद संदर्भात पत्रक प्रसारित करण्यात आले असून अशा प्रकारचा कोणताही बंद अधिकृतरित्या कोणत्याही संघटनेने जाहीर केलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांना कोणीही बळी पडू नये व सोशल मीडियावर अशा प्रकारे संदेश प्रसारित करणाऱ्यांवर पोलिस करडी नजर ठेऊन आहेत. जबरदस्तीने कोणी बंद करण्याचा अथवा समाजात शांतता भंग करण्यासाठी प्रयत्न केला तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..