काल बुधवार, दिनांक – ११ जुन, २०२५ रोजी संपुर्ण मतदारसंघात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले, घरांवरील पत्रे उडाली, घराचा भिंती कोसळल्या, शेतकऱ्यांचा शेतात उभी पिके जमीनदोस्त झाली, पशुधनांचे मोठे नुकसान होवुन जिवीतहानी देखील झाली, काही ठिकाणी झाडे, घरे पडुन जिवीतहानी झाली आहे. ह्या आसमानी संकटाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.काल या पावसानंतर लागलीच संबंधित अधिकाऱ्यांशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून सरसकट पंचनामे करण्याचा सुचना दिल्या असल्या, तरी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा बांधावर, तसेच पडझड झालेल्या घरांची एरंडोल तालुक्यात पाहणी केली.










