राजाला संपवलं, मध्यप्रदेशात आली, प्रियकराला भेटली आणि नंतर… पोलिसांनी सगळाच घटनाक्रम सांगितला.

मध्य प्रदेश पोलिसांनी मंगळवारी दावा केला की पूर्व उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर गोंधळलेल्या आणि विस्कळीत अवस्थेत दिसलेली सोनम रघुवंशी मेघालयात तिच्या पतीच्या हत्येनंतर काही दिवसांनी इंदूरला परतली होती.दर दिवशी राजा रघुवंशी हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. राजाच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिला पोलिसांनी मेघालय पोलिसांनी अटक केली. सोनमने तिच्या प्रियकरासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला आणि मारेकऱ्यांमार्फत राजाला संपवलं. या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी मंगळवारी दावा केला की पूर्व उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर गोंधळलेल्या आणि विस्कळीत अवस्थेत दिसलेली सोनम रघुवंशी मेघालयात तिच्या पतीच्या हत्येनंतर काही दिवसांनी इंदूरला परतली होती. ती तीचा प्रियकर राज कुशवाहाला तो रहात असलेल्या भाड्याच्या खोलीत येऊन भेटली आणि तीथे दोघांनी पुढचा डाव आखला.२४ वर्षीय सोनम रघुवंशी २३ मे रोजी पूर्व खासी हिल्समधील वेई सावडोंग धबधब्याजवळून गायब झाली होती. जिथे ती आणि तिचा पती राजा रघुवंशी (२८) हनिमूनसाठी गेले होते. २ जून रोजी राजाचा मृतदेह धबधब्याच्या पार्किंग लॉटजवळील एका दरीत सापडला. दरम्यान सोनम बेपत्ता होती. ९ जून रोजी गाजीपूरमध्ये तिच्या पुन्हा येण्याने प्रकरणाचे गूढ आणखी वाढले. इंदूर पोलिसांनी सांगितले की, “जो दावा तीने केला तो खोटा होता. तिचे कधीही अपहरण झाले नव्हते. आमच्याकडे माहिती आहे की सोनम २५ मे ते २७ मे दरम्यान ट्रेनने इंदूरला पोहोचली आणि देवास गेटमधील भाड्याच्या खोलीत राहिली,” असे अतिरिक्त डीसीपी (गुन्हे शाखा) राजेश दंडोटिया यांनी सांगितले.

“तिचा सहआरोपी राज कुशवाहा तिला तिथे भेटला. नंतर त्याने तीला उत्तर प्रदेशला जाण्यासाठी टॅक्सीची व्यवस्था केली.” असेही अधिकारी म्हणाले.तीला उत्तर प्रदेशला का पाठवण्यात आले हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. तीने ज्या ज्या मार्गांनी प्रवास केला ते शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तीने केलेला प्रवास जाणूनबुजून गोंधळात टाकणारा असल्याचे तपासकर्त्यांनी म्हटले आहे. रेल्वे रेकॉर्डवरून असे दिसून येते की तिने २३-२४ मे नंतर गुवाहाटीहून पाटणाला ट्रेनने प्रवास केला असावा. “आमच्याकडे गुवाहाटी-पाटणा ट्रेनमधून उतरतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला होता.” असे उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.राजाच्या मृत्यू पासून सोनमला अटक होईपर्यंतचा मधला १५ दिवसांचा काळ हा ‘मानसिक आघातामुळे निर्माण झालेल्या स्मृतिभ्रंशाची कथा रचण्याचा एक सुनियोजित प्रयत्न’ असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाजीपूर वन-स्टॉप सेंटर, सरकारी मदत केंद्र, येथे तिने तिच्या १५ तासांच्या वास्तव्यात सात तास झोप काढली. डॉक्टर आणि पोलिसांची चौकशी टाळण्यासाठी पुन्हा पुन्हा “मुझे कुछ याद नहीं है” असे सोनम म्हणत असे. त्यादरम्यान तिचा चेहरा सुजलेला,केस विस्कटलेले, एकटक कुठेतरी बघत राहणं यामुळे मदत केंद्रातील कर्मचारी गोंधळले होते.

“ती वधूसारखी दिसत नव्हती. ना दुःख, ना नवऱ्याचा उल्लेख. तिच्या चेहऱ्यावर फक्त थकवा आणि झोप होती,” असे एका महिला अधिकाऱ्याने सांगितले.इंदूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या सहा दिवसांनी आणि हनीमूनच्या तीन दिवस आधी म्हणजे, १७ मे रोजी राजाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. सोनम १५ मे रोजी तिच्या पालकांच्या घरी परतली आणि तीने दुसऱ्या सिमवरून राजशी पुन्हा संपर्क साधला. १६ मे रोजी ते तासन् तास बोलत होते. दुसऱ्या दिवशी, राज त्याचे तीन बालपणीचे मित्र आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद कुर्मी यांना इंदूरच्या सुपर कॉरिडॉरमधील एका रेस्टॉरंटमध्ये भेटला. जिथे हत्येचे नियोजन करण्यात आले होते. हे तिघे इंदूरहून नवी दिल्लीमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या ट्रेनने निघाले.आणि २१ मे रोजी शिलाँगला पोहोचले.सोनम आणि राजा यांनी कपलला मिळणाऱ्या एका भाड्याच्या कारने प्रवास करण्याचे ठरवले. सोनमने आरोपींना लाईव्ह लोकेशन पाठवले. दरम्यान, एका वेगळ्या ठिकाणी सोनमने राजाला फोटो काढण्यासाठी नेले आणि योग्य क्षणाची वाट पाहिली असा आरोप पोलिसांनी केला. “आरोपींनी राजाला जंगलातील एका कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही,” असे इंदूरमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याऐवजी, हल्लेखोरांनी गुवाहाटीतून विकत घेतलेल्या चाकूचा वापर केला आणि सोनमच्या डोळ्यांदेखत एका दुर्गम भागात राजावर वार करून त्याला ठार मारले.” सोनमने राजला पाठवलेले फोन रेकॉर्ड आणि मेसेजेस तिच्या ‘स्मरणशक्ती कमी झाल्याच्या आणि अपहरण झाल्याच्या’ दाव्यांच्या विरोधात आहेत, असे यूपी पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान तिचे मौन, उदासीन वर्तन आणि यूपीला परतण्याचा गुंतागुंतीचा मार्ग हे आघातापेक्षा नियोजनबद्ध पळून जाण्याकडे निर्देश करतात, असे तपासकर्त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..