विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर कोकणात शिंदेंच्या शिवसेनेचे टायगर ऑपरेशन नंतर पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मोहरा रत्नागिरी जिल्ह्यात उतरवला आहे.विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर कोकणात शिंदेंच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नंतर पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हा मोहरा रत्नागिरी जिल्ह्यात उतरवला आहे. अमोल कीर्तीकर गेले काही महिने उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात ऍक्टिव्ह मोडवर आहेत. अशातच अलीकडे कुणबी समाजाचे नेते गुहागरचे माजी नगराध्यक्ष सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर ठाकरे गटातील प्रवेशानंतर रत्नागिरी जिल्ह्याची संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.सहदेव बेटकर यांच्या चिपळूण येथे झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अमोल कीर्तीकर यांनी बेटकर यांना पुढील विधानसभेची तयारी करा, असं थेट व्यासपीठावरूनच जाहीरपणे सांगितलं. दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदारसंघातून तयारी करा तुमच्यासाठी आम्ही पहिला नंबर लावला आहे. दापोली खेड मधील जनतेचा आशीर्वाद तुमच्या पुढे मागे उभे करू, ही जबाबदारी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची आहे, असं विधान करत आगामी राजकारणाचे स्पष्ट संकेत किर्तीकरांनी दिले होते. रामदास कदम योगेश कदम यांना शह देण्यासाठी ठाकरेंनी मुंबईतील अमोल कीर्तीकर हा मोहरा वापरत रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. किर्तीकर यांच्या विधानातून बेटकर यांना दापोली खेड मतदारसंघातून कदमांच्या विरोधात उतरवण्याची रणनीती असल्याचे पाहायला मिळाले आहे.










