बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत गोविंदबागेत महत्त्वाची बैठक होणार आहे. अजित पवार यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने छत्रपतीमधून माघार घेतल्याने, ते माळेगावची निवडणूक लढणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. या संदर्भात शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील गोविंदबागेत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र “मला लढायचेच आहे,” असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी ब वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीला अधिक महत्त्व दिले आहे.










