लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीबद्दल ट्विट करत पुन्हा गंभीर आरोप केले. यावर आता निवडणूक आयोगाने अतिशय भावनिक पद्धतीने राहुल गांधींच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले.लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीबद्दल ट्विट करत पुन्हा गंभीर आरोप केले. ‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चोरली गेली,’ असा मोठा दावा गांधीनी केला. यानंतर आता निवडणूक आयोगाने यावर प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक आयोगाने अतिशय भावनिक पद्धतीने राहुल गांधींच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्राच्या मतदार यादीबाबत केले जाणारे आरोप हे कायद्याचा अपमान असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.
निवडणूक आयोगाने म्हटले की, त्यांनी २४ डिसेंबर २०२४ ला काँग्रेस पक्षाला उत्तर दिले होते. ते उत्तर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, आम्ही मांडलेल्या तथ्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे आणि तेच मुद्दे पुन्हा उपस्थित केले जात आहेत, असे दिसून येते.आयोगाने पुढे असेही म्हटले की, कोणीही खोटी माहिती पसरवणे हे केवळ कायद्याचा अनादर करण्याचे लक्षण नाही, तर स्वतःच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणे देखील आहे. तसेच निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचवणारे आहे.’मतदारांद्वारे कोणत्याही प्रतिकूल निर्णयानंतर, निवडणूक आयोगाला असे समजून बदनाम करण्याचा प्रयत्न करणे की ही तडजोड झाली आहे, हे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. याचा अर्थ असा होतो की, पराभवानंतर निवडणूक आयोगावर आक्षेप घेणे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी खूप मेहनत करतात आणि त्यांच्यावर शंका घेणे योग्य नाही.’असेही आयोगाने नमूद केले.तर आयोगाचे असेही म्हणणे आहे की, निवडणूक पराभूत झाल्यानंतर काही लोक निवडणूक आयोगावर खोटे आरोप करतात. हे चुकीचे आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन होते. निवडणूक आयोगाने आधीच सर्व आरोपांना उत्तर दिले आहे आणि ते वेबसाइटवर देखील टाकले आहे.









