नुकताच आयुष्याला सुरुवात करणाऱ्या युवकाचा असं दुर्दैवी झालेला मृत्यू चटका लावणारा ठरला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घडशी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात नदीत, विहिरीत, तळ्यावर पोहायला जाताना काळजी घेणे आवश्यक असते अन्यथा जीवावरती बेतू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यात घडली आहे मित्रांबरोबर पोहायला गेलेल्या युवकाला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दुर्दैवीरित्या आपला जीव गमवावा लागला आहे. १७ वर्षीय आदेश दत्ताराम घडशी असे या युवकाच नाव आहे. तो मूळचा देवरुख येथील आहे. या युवकाचारत्नागिरी तालुक्यातील सोमदेव तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आदेश याने नुकतीच यंदा बारावी पास झाला होता. आदेश मूळचा देवरुख येथील आहे.











