सातारा जिल्ह्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. अमोल चव्हाण आणि धनंजय चव्हाण हे दोघे चुलते-पुतणे होते.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथे एसटी बस थांब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत चुलत्या-पुतण्या जागीच ठार झाले. अमोल रघुनाथ चव्हाण (वय 40) व धनंजय बबनराव चव्हाण (56, दोघे रा. भोळी, ता. खंडाळा) अशी ठार झालेल्या चुलत्या-पुतण्याची नावे आहेत. हे दोघे शिरवळ येथील नातेवाईकाच्या साखरपुडा कार्यक्रमास गेले होते.











