मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव करत आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या, तर गुजरात टायटन्स 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावाच करू शकली. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा सामना आता पंजाब किंग्सशी होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सवर मिळवलेल्या विजयानंतर खूप आनंदी होता. त्याने आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला त्याने ‘लक्झरी’ असल्याचे म्हटले.गुजरातविरूद्धच्या एलिमिनेटरमध्ये विजय मिळवल्यानंतर हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहची प्रशंसा करताना खास कौतुक केलं.
हार्दिकने बुमराहला “तो मुंबईतील घरांच्या किंमतीसारखा आहे, तो खूप महाग आहे”, असल्याचे म्हटलं आहे. जेव्हा त्याला वाटले की सामना हातातून निसटत आहे, तेव्हा बुमराहला गोलंदाजी दिली आणि त्याने नेहमीच संघासाठी यश मिळवले, असे पांड्याने सांगितले. गुजरातविरुद्ध बुमराहने शानदार गोलंदाजी केली आणि महत्त्वाचे विकेट्स घेतले, ज्यामुळे गुजरातच्या फलंदाजीवर दबाव आला.एक वेळ अशी होती की सामना बरोबरीवर होता, विकेट फलंदाजीसाठी चांगली झाली होती, पण आम्हाला नियंत्रण ठेवायचे होते. बेअरस्टोने वेळ घेतला आणि एकदा लय मिळाल्यानंतर त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहणे सुखद होते.
आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या क्वालिफायर 2 साठी सज्ज व्हायचे आहे, असे हार्दिकने सांगितले.गुजरात टायटन्सवर विजय मिळाल्यामुळे मुंबईचा सामना आता 1 जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जशी होणार आहे. क्वालिफायर-2 मध्ये जिंकणारा संघ 3 जून रोजी आरसीबीविरुद्ध अंतिम सामन्यात ट्रॉफीसाठी लढेल. आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवले. यानंतर हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. बुमराहने नेहमीच टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे, असे तो म्हणाला. गुजरातवर विजय मिळवल्यामुळे आता मुंबईचा सामना पंजाब किंग्जबरोबर होणार आहे.










