मुलानपूर : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंक रंगला होता. त्यामुळे हे एक षटक दोन्ही संघांसाठी निर्णयाक ठरणारं होतं. हे षटक टाकण्यासाठी रिचर्ड ग्लेसनची निवड केली होती. पण तीन चेंडूंनंतर त्याला दुखापत झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू अश्विनी कुमार यावेळी गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी मुंबईला जिंकवण्यासाठी मनात नेमकं काय चाललं होतं, हे त्याने सांगितलं.अखेरच्या षटकात गुजरातच्या संघाला विजयासाठी २४ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर रिचर्डने एक धाव दिली, तर दुसरा चेंडू निर्धाव ठरला.
त्यानंतर झालेल्या तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या, पण त्यानंतर रिचर्डला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला गोलंदाजी करता येणार नव्हती. त्यामुळे आता करायचं काय, हा प्रश्न होता. कारण जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांची षटके संपलेली होती. अश्विनी यावेळी चांगली गोलंदाजी करत होता. त्यामुळे हे तीन चेंडू टाकण्याची मोठी जबाबदारी अश्विनीवर सोपवली.अश्विनीने हे तीन चेंडू अप्रतिमपणे टाकले. अश्विनीने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट काढली. त्यांतर दोन्ही चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. त्यामुळे मुंबईला विजय साकारता आला. पण त्यावेळी आपल्या मनात काय सुरु होतं, हे आता अश्विनीने सांगितलं आहे.
अश्विनी यावेळी म्हणाला की, ” अखेरची तीन षटकं टाकण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आली होती. पण त्यावेळी माझ्या मनात एकच गोष्ट सुरु होती आणि ती गोष्ट म्हणजे माझ्याकडून एकही नो बॉल पडायला नको. कारण नो बॉल पडला तर त्यामुळे दुप्पट नुकसान होते. त्यामुळे मी यावेळी काही करून नो बॉल टाकायचा नाही, हे ठरवलं होतं. ” अश्विनीने तिन्ही चेंडूवर कोणतीच चूक केली नाही आणि त्यामुळेच हा विजय मुंबईच्या संघाला मिळवता आला.अश्विनी कुमारने अखेरच्या तीन चेंडूत एकही धाव दिली नाही आणि एक बळीही मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा विजय अधिक सुकर झाल्याचे पाहायला मिळाले.










