भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 30 मे 2025 च्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,710 वर पोहोचली आहे.देशात सर्वाधिक सक्रिय कोविड-१ चे रुग्ण केरळमध्ये आहेत. तिथे 1,147 लोकांना लागण झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 467, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 रुग्ण आहेत.महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोविड-19 चे 84 नवीन रुग्ण आढळले आहेत. 84 रुग्णांपैकी 32 रुग्ण मुंबईत आढळले ठाणे महापालिका क्षेत्रात 14 रुग्ण, ठाणे ग्रामीण 2 रुग्ण, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत 1, रायगडमध्ये 2 रुग्ण, नाशकात 1 रुग्ण, 19रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात साताऱ्यात दोन रुग्ण, कोल्हापूरात 2 रुग्ण, सांगलीत 3 रुग्ण इत्यादींचा समावेश आहे.
त्यामुळे यावर्षी राज्यात करोनामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या 681 झाली आहे. सध्या राज्यात 467 सक्रिय रुग्ण आहेत.WHO च्या माजी मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “यामुळे घाबरण्याची गरज नाही. करोना व्हायरस भविष्यातही आपल्यासोबतच राहणार आहे. काही महिन्यांच्या अंतराने कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होईल. आपल्याकडे चांगली रोगप्रतिकारशक्ती आहे. लसीकरणामुळे आपल्याला अधिक संरक्षण मिळते. त्यामुळे करोनामुळे होणारा संसर्ग आता खूप सौम्य आहे.”त्या म्हणाल्या, “व्हायरल इन्फेक्शनवर अँटिबायोटिक औषधांचा काहीही परिणाम होत नाही. मग तो कोविड असो, इन्फ्लूएंझा असो किंवा श्वसनमार्गाचा कोणताही व्हायरस असो.
अशावेळी फक्त लक्षणांवर आधारित उपचार घ्या. तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, गुळण्या करू शकता, त्याने आराम मिळतो. जेव्हा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनहोते, तेव्हाच अँटिबायोटिक्सची गरज असते.”तज्ञांच्या मतानुसार करोनाची गंभीर परिस्थिती नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या.करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखा. वारंवार आपले हात साबणाने धुवा.










