काढलेल्या पिकांचीही नासाडी, पण उभ्या पिकांचेच पंचनामे करण्याचे सरकारी धोरण; शेतकऱ्यांची भिस्त विमा कंपन्यांवर.

नाशिक जिल्ह्यात, काढणी केलेल्या कांद्यासह विविध पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचेच पंचनामे करण्याचे सरकारी धोरण असल्याने काढलेल्या पिकांच्या नुकसानीला मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.शेतांमध्ये काढून ठेवलेल्या कांद्यासह विविध पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, उभ्या पिकांचाच पंचनामा करण्याचे सरकारचे धोरण असल्याने काढून ठेवलेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता धूसर आहे. विशेष म्हणजे काढणी केलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची तरतूदच नसल्याने नेमके किती नुकसान झाले, याची माहिती आमच्याकडे नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात रविवारी (दि. २५) सिन्नरसह काही तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सिन्नर मंडळात विक्रमी १५०.३ मिलीमीटर, तर डुबेरे मंडळात १४५.२ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय वावी मंडळातदेखील ६८.४ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. सिन्नर गावठाणात तर ढगफुटी नोंदविली गेली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथील पिकांच्या मुळावर हा पाऊस उठला आहे. पिकांच्या हानीबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होते आहे. शेतांमध्ये उभ्या असलेल्या म्हणजेच कापणी न केलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून केले जातात.

अशा पिकांच्या नुकसानीपोटी सरकारी नियमानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदतही केली जाते. त्यामुळे अशा नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.एकट्या सिन्नर तालुक्यात आतापर्यंतच्या पावसामुळे १५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश पिकांची कापणी पूर्ण झाली असून, ही पिके शेतामध्येच काढून ठेवण्यात आली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढून तो शेतांमध्येच ठेवला होता. अशा कांद्याचे पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने सोमवारी वर्तविला. परंतु, नेमके किती नुकसान झाले याची माहिती प्रशासनाकडेही नाही. अशा पिकांचे पंचनामे महसूल यंत्रणेकडून केले जात नाहीत. त्यामुळे पिकांची कापणी करून ती शेतांमध्ये ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत होणार नसल्याचे चित्र सध्या आहे.जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत ३६ हेक्टरवरील भाजीपाला, १.५९ हेक्टरवरील बाजरी, ०.५० हेक्टरवरील कांदा रोपवाटिका, साडे पाच हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पिकांचा विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळविण्याचा हक्क प्राप्त होतो.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केली असेल, त्यांनी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तत्काळ संबंधित विमा कंपनीला कळविणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आहे.जिल्ह्यात २३ ते २५ मे या तीन दिवसांत पावसामुळे ३४९.६९ हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. नऊ तालुक्यांमधील ५३ गावांतील ४९८ शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. रविवारी जिल्ह्यात सिन्नरसह काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. ५ मेपासून दररोज कोठे ना कोठे कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे. त्यामुळे शेतांमधील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. शुक्रवार दि. २३ मे ते रविवार दि. २५ मे अशा तीन दिवसांत जिल्ह्यात एकूण ३४९.६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये २९२.८० हेक्टर क्षेत्र कांदा पिकाचे आहे. सटाण्यात १८९ हेक्टरवरील तर नाशिक तालुक्यात ६१ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले आहे.

  • Related Posts

    पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन…

    पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन” जळगाव- मोहाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा पूर्ण अंधार असल्यामुळे रुग्ण, विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत…

    नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला?

    नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला? कोपरगावं तालुक्यातील वाळू माफियानी हद्द पार केली असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर दररोज पुराव्या निशी तक्रारी दाखल होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..