नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला?

कोपरगावं तालुक्यातील वाळू माफियानी हद्द पार केली असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर दररोज पुराव्या निशी तक्रारी दाखल होत आहे, परंतु महसूल अधिकारी कारवाई करण्यासाठी टाळा टाळ करत असून याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तसेच विश्वासनिय माहिती नुसार एका जबाबदार वरिष्ठ पथकाने तर एक वाळू चोरी करत असताना धारणगाव येथून मोरक्याचा वाळूचा ट्रॅक्टर सोडून दिल्याची खात्रीजनक माहिती प्रसार माध्यमंमध्ये बोलली जात असून आपले हात ओले करून पुन्हा पथक दिसेनासे झाले आहे या संदर्भात जर या धारणगाव माहेगाव देशमुख येथील वाळू चोरांनावर जो अधिकारी कारवाई करेल त्याची नोकरी धोक्यात येते असा देखील बोलबाला आता अधिकारी वर्गात दबक्या आवाजात बोलला जात आहे कारण आज पर्यंत ज्या अधिकाऱ्याने धारणगाव, माहेगाव देशमुख येथे कारवाई केली

त्याला 15 दिवसात लाच लुचपत खात्याला कारवाई साठी सामोरे जावे लागले आहे हा देखील कोपरगावं तालुक्याचा आज पर्यंतचा इतिहास राहिला आहे यामुळे सर्व महसूल अधिकारी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या वाळू माफियानवर कारवाई साठी कोणताही अधिकारी पुढे सरसावत नाही तसेच पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी एक महिना प्रामाणिक कारवाई केली तर कोपरगाव तालुका नव्हे च संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू, गांज्या, अवैध धंदे संपूर्ण बंद झाले होते परंतु तश्या प्रकारच्या कारवाई होताना दिसत नसल्याने कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे वेशीला टांगली गेली आहे आणि याउलट संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चांगल्या चांगल्या गुन्हेगारांच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी अवळया असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा आवाज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ऐकू येत असल्याने चांगल्या चांगल्या गुन्हेगारांचे धाबे दनालले असून अशी प्रामाणिक कारवाई कोपरगाव तालुक्यातील वाळू माफियानावर कधी होईल हा प्रश्न सामान्य जनतेला पडला असून कोपगाव वाळू माफी्यांचा मोहल्ला असे नागरिकांन मध्ये बोलले जात आहे!










