अलीकडेच पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचे बळी गेले. या प्रकारामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर वार करणाऱ्या अशा घटनेनंतरही, भारतातील काही वृत्तवाहिन्या “चर्चासत्र” किंवा “डिबेट” या नावाखाली पाकिस्तानातील पत्रकार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, तथाकथित विश्लेषक यांना आमंत्रित करतात.









