बीड पुन्हा हादरलं! दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यावर कोयत्यानं वार, आरोपी स्वतः पोलिसांना शरण, काय घडलं नेमकं?

आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. मयत बाबासाहेब आगे उभे असताना, अचानक त्यांच्यावर आरोपी नारायण शंकर फपाळ याने हल्ला केला. बाबासाहेब आगेंवर कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर स्वतः आरोपी नारायण शंकर फपाळ याने माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्या केल्याची कबुली दिली.दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने बीड पुन्हा एकदा हादरलं आहे. बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा तरुणाची धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाबासाहेब आगे अस मयत तरुणाचं नाव आहे. खून करणारा आरोपी घटनेनंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नारायण शंकर फपाळ असं आरोपीचे नाव आहे.

माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भर वस्तीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. मयत बाबासाहेब आगे भाजपचा सक्रिय कार्यकर्ता होता. दोनच दिवसांपूर्वीच मंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे आज (१५ एप्रिल) भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. मयत बाबासाहेब आगे उभे असताना, अचानक त्यांच्यावर आरोपी नारायण शंकर फपाळ याने हल्ला केला. बाबासाहेब आगेंवर कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर स्वतः आरोपी नारायण शंकर फपाळ याने माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्या केल्याची कबुली दिली.बीडमध्ये वाढत चाललेल्या या अराजकतेला आळा बसत नसल्याचे चित्र सध्या आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील बरेचसे गुन्हे उघडकीस आले. परंतु गुन्हेगारांवर अद्यापही कायद्याचा वचक बसला नसल्याचेच दिसत आहे. दिवसाढवळ्या माणसांवर हल्ले होत असताना प्रशासन त्याविरोधात कठोर पाऊले उचलण्यात कमी पडत आहे का? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

  • Related Posts

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते. ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला…

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack)…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.