छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यावसायिकाने परिस्थितीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नागपुरात एका व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मी खूप थकलो, अडचणींचा सामना करून कंटाळलो, तू प्रॉमिस केलं मेहनत करून ऑफिसर होणार आहेस. तुझ्या आईची काळजी घे, धन्यवाद! लवकर पुन्हा भेटू’, अशा आशयाचा मजकूर लिहून फायनान्स व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात घडली.










