शिवसेना भवन परिसरात अचानक तणावाचं वातावरण, ठाकरेंचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर अन् पोलीस…

 शिवसेना भवन परिसरात शेकडो ठाकरे गटाचे समर्थक जमले. या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला जात होता. पण याचवेळी पोलिसांचं घटनास्थळी आगमन झालं. त्यामुळे वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला. पोलीस सध्या परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.शिवसेना भवन परिसरात आज अचानक मोठा गदारोळ बघायला मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आज दादर येथील शिवसेना भवन येथे जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून दादर, माहीम आणि मुंबईच्या इतर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय. पाणी पुरवठ्याच्या याच समस्येवरुन ठाकरे गट आक्रमक झालेला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनी याआधीदेखील या मुद्द्यावरुन पत्रकार परिषद घेतली होती. तसेच त्यांनी टँकर असोसिएशनच्या संपावरही भूमिका मांडली होती. मुंबईच्या धरणांमध्ये पाणी कमी झाल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय. पण यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय. याच समस्येवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी मुंबई महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या मोर्चासाठी रितसर परवानगी देखील मागण्यात आली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. तरीदेखील आज ठाकरेंचे शेकडो शिवसैनिक शिवसेना भवन येथे दाखल झाले. हे शिवसैनिक मुंबई महापालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा घेऊन जाण्याच्या पवित्र्यात होते. ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला. पण याचवेळी पोलिसांचं आगमन झालं. त्यामुळे शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात गोंधळ झालेला बघायला मिळालाकुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यावर शिवसैनिक आक्रमक झाले. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसवर मोर्चा घेऊनच जाणार, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात गोंधळ बघायला मिळाला. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जात आहे. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी नुकतंच टँकर असोसिएशनच्या संपावर भूमिका मांडत प्रश्न उपस्थित केले आहेत. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या मोर्चाच्या हाकेनंतर आज शेवटी मुंबईच्या आयुक्तांनी टँकर असोसिएशनला हमी दिली आणि संप मागे घेतला गेला, पण तरीही काही प्रश्न उरतातच! वारंवार टॅंकर असोसिएशनकडून दिल्या गेलेल्या इशाऱ्यांनंतरही आणि गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या संपानंतरही आजवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं नियंत्रण असलेली मुंबई महानगरपालिका गप्प का होती? महावीर जयंती, हनुमान जयंती आणि आंबेडकर जयंतीसारख्या सणांच्या दिवशी मुंबईकरांना मुद्दाम त्रास देण्यासाठीच ह्या संपाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं का?”, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.”संप समाप्तीची घोषणा मुंबई महानगरपालिका मुख्यालयातून होण्याऐवजी भाजपा आमदाराच्या मंचावरुन होणं तर जास्त शंका निर्माण करणारं नाहीये का? जणू काही क्रेडिट घेण्यासाठी मुद्दाम संप २ दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं गेलं आणि मग श्रेय घेण्यासाठी नाटक केलं?”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.”मुंबईकरांनी भाजपाचा हा डाव आणि मुंबईबद्दल असलेला आकस वेळीच ओळखावा. मुंबईकरांचं भलं करण्याऐवजी मुंबईकरांना वेठीस धरुन स्वतःचं राजकारण खेळण्याची ह्यांची वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे” अशीदेखील टीका त्यांनी केली.

  • Related Posts

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    विरारमध्ये एका सात महिन्यांच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. हे बाळ आईच्या कडेवर असताना ते खिडकीतून थेट खाली पडल्याची माहिती आहे. सात महिन्यांचं बाळ ज्याने जेमतेम जग बघायला…

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुश्ताक जीव वाचवून बाहेर पडला. सुरुवातीला फुगे फुटत आहेत का, असे वाटले. परंतु बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज वाढत गेले, असे त्याने सांगितले.‘अलीकडच्या काळात जम्मू आणि काश्मिर शांत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य.

    ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य.

    सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.

    सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.