या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुश्ताक जीव वाचवून बाहेर पडला. सुरुवातीला फुगे फुटत आहेत का, असे वाटले. परंतु बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज वाढत गेले, असे त्याने सांगितले.‘अलीकडच्या काळात जम्मू आणि काश्मिर शांत होत होते, परंतु मंगळवारी काश्मीर पुन्हा अशांत झाले. पर्यटकांची संख्या वाढली होती, आता पुन्हा रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ येईल,’ अशी भीती पहलगामचा नागरिक मुश्ताक अहमद वानी याने महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केलपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, पनवेलचे दिलीप देसले, तसेच पुण्याचे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा समावेश आहे. डोंबिवलीतील तीन मावसभावांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याने संपूर्ण डोंबिवली आणि कल्याण शहरावर शोककळा पसरली.










