सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारतानं सिंधू जल समझोता रद्द करण्याचा मोठा निर्णय काल घेतला. त्यानंतर आजही पाकिस्तान विरोधात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारतानं सिंधू जल समझोता रद्द करण्याचा मोठा निर्णय काल घेतला. त्यानंतर आजही पाकिस्तान विरोधात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. दुसरीकडे पाकिस्ताननं भारताला आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्ताननं मोठे निर्णय घेतले आहेत. यात भारतासोबतचा व्यापार रोखण्याचा, वाघा सीमा बंद करण्याचा, भारतीय विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द वापरु न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं (पीएमओ) जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेची परिस्थिती, विशेषत: पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीबद्दल चर्चा झाली. ‘पर्यटकांचा जीव गेल्याबद्दल चिंता व्यक्त करत समितीनं २३ एप्रिल २०२५ रोजी भारतानं केलेल्या उपाय योजना एकतर्फी, अन्यायपूर्ण आणि राजकीय हेतूनं प्रेरित, बेजबाबदार, बेकायदेशीर असल्याचं म्हटलं,’ अशी माहिती निवेदनात आहे.वाघा सीमेवरील चौकी तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन वाघा सीमा ओलांडून गेलेल्या नागरिकांना लवकर मायदेशी परतण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. सार्क व्हिसा सवलतीच्या अंतर्गत भारतीय नागरिकांना देण्यात आलेले सगळे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला आहे. शीख धार्मिक तीर्थस्थळांना यातून वगळण्यात आलं आहे. शीख तीर्थक्षेत्रांच्या भेटीसाठी देण्यात आलेले व्हिसा या कारवाईतून वगळण्यात आलेले आहेत.सध्याच्या घडीला पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना देश सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आलेला आहे. सल्लागारांच्या सहायक कर्मचाऱ्यांना भारतात परत जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाची क्षमता ३० एप्रिल २०२५ पासून कमी करण्यात आली आहे. ३० एप्रिलपासून उच्चायुक्तालयात केवळ ३० जण असतील. यामध्ये राजदूत आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.भारतीय विमान कंपन्यांनाविरोधातही पाकिस्तानी सरकारनं फर्मान काढलं आहे. भारतीय विमान कंपन्यांकडून होणारा पाकिस्तान हवाई हद्दीचा वापर रोखण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानवरुन उड्डाण करता येणार नाही. भारतासोबतचा व्यापारही पाकिस्ताननं रोखला आहे. अन्य देशांच्या मार्गेही भारतीय नागरिकांना पाकिस्तानात प्रवास करता येणार नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.