जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील एक तरुण त्याच्या ५ मित्रांसोबत औरंगाबादहून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेला होता. यावेळी चंद्रभागेत बुडून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील तरुण त्याच्या ५ मित्रांसोबत औरंगाबादहून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेला होता. यावेळी चंद्रभागेत बुडून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका मित्राला तेथील भाविकांनी वाचवले आहे.यावल तालुक्यातील न्हावी येथील मोलमजुरी करणाऱ्या कोलते परिवारातील दर्पण निलेश कोलते (वय, १८ वर्षे) व त्याचे मित्र मनोज रघुनाथ कापडे, दिगंबर निलेश पवार आणि चाळीसगाव व परडी येथील दोन तरुण असे पाच मित्र औरंगाबाद येथे गव्हर्नमेंट पॉलीटेक्निकल कॉलेजला दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते.










