विठुरायाच्या दर्शनासाठी गेला पण काळाने गाठले; चंद्रभागेत बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा.

जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील एक तरुण त्याच्या ५ मित्रांसोबत औरंगाबादहून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेला होता. यावेळी चंद्रभागेत बुडून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यातील न्हावी येथील तरुण त्याच्या ५ मित्रांसोबत औरंगाबादहून पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेला होता. यावेळी चंद्रभागेत बुडून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका मित्राला तेथील भाविकांनी वाचवले आहे.यावल तालुक्यातील न्हावी येथील मोलमजुरी करणाऱ्या कोलते परिवारातील दर्पण निलेश कोलते (वय, १८ वर्षे) व त्याचे मित्र मनोज रघुनाथ कापडे, दिगंबर निलेश पवार आणि चाळीसगाव व परडी येथील दोन तरुण असे पाच मित्र औरंगाबाद येथे गव्हर्नमेंट पॉलीटेक्निकल कॉलेजला दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते.

दिगंबर पवार हा रावेर येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेत असून, तीन दिवसांची सुट्टी असल्याने पाचही मित्रांनी विठुरायाचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि ते पंढरपूरला रवाना झाले.तिथे मनोज कापडे, दिगंबर पवार आणि मयत दर्पण कोलते हे चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ अंघोळीसाठी गेले असता यातील मनोज आणि दर्पण हे दोघं उतरले. त्यात नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने तिथे दर्पणचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला तर दुसरा मनोज पाण्यात बुडत होता. त्याला दिगंबर पवार हा नदीकाठी बसलेला असल्याने त्याने आरडाओरड केली व भाविकांना जमा केले. तात्काळ भाविकांनी मनोजला वाचविले.दर्पण मात्र बुडाला असल्याने आठ तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी आठ वाजता न्हावी गावात आणण्यात आला, अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्पण कोलते हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता. आई वडील मजुरी करतात व दोन्ही मुलांचे शिक्षण करीत होते. लहान भावाने इयत्ता दहावीची परीक्षा नुकतीच दिलेली आहे. तर मोठा भाऊ औरंगाबाद येथे पॉलीटेक्निक कॉलेजला शिक्षण घेत होता. अशा या कठीण परिस्थितीत या तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे.  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम…

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

     पंतप्रधान मोदींकडे  प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…