रेशीम दोरखंड, चांदीचा पेला, बाबासाहेबांनी विहिरीतून पाणी काढलं, सोलापुरातील आठवणी!

महामानवाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1937 साली सोलापूर दौऱ्यावर होते. बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आज ही जपून ठेवल्या आहेत.बोधिस्तव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आहे. देशभरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन करण्यासाठी भीम अनुयायी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आज अभिवादन करत असताना त्यांच्या असंख्य आठवणी आजही भारतीयांसाठी पूजनीय आहे. असाच अमूल्य ठेवा सोलापूरकरांनी जपून ठेवला आहे. महामानवाच्या 1937 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आज ही जपून ठेवल्या आहेत.त्याकाळी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने विहीर बांधली होती. लोकांनी या विहिरीतून पाणी काढण्याची विंनती बाबासाहेबाना केली. लोकांच्या आग्रहाखातर रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून बाबासाहेबांनी पाणी काढले.

त्याकाळी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने विहीर बांधली होती. लोकांनी या विहिरीतून पाणी काढण्याची विंनती बाबासाहेबाना केली. लोकांच्या आग्रहाखातर रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून बाबासाहेबांनी पाणी काढले.त्यानंतर स्वतः हे पाणी प्राशन केलं. तेव्हापासून आजतगायत वळसंग गावातील हजारो नागरिक या विहिरीतील पाण्याला अमृताहून अधिक महत्व देतात.वळसंग येथीलया ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला ‘आंबेडकर बावडी’ असं नावं देण्यात आलय. वळसंग येथील ‘आंबेडकर बावडी’ विहिरीवर आजही भीम अनुयायी भेट देतात. नुकतचं या विहिरीवर प्रशासनाच्यावतीने डोम देखील वांधण्यात आले आहे.बाबासाहेबांच्या दौऱ्यांची अशीच आठवण सोलापुरातील पसलेलू कुटुंबाने जपून ठेवलीय.

14 जानेवारी 1946 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते.त्यावेळी फ़ॉरेस्ट भागातील गंगा निवास येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्काम केला. सकाळी याचं घरात बाबासाहेबांनी नाश्ता ही केला. याच आठवणी जपत ज्या ताटात बाबासाहेबांनी नाश्ता केला ते ताट, ग्लास, वाटी, कप असे सर्व साहित्य पसलेलू कुटुंबाने मोठ्या अभिमानाने जपून ठेवल्या आहेत.भीम अनुयायी देखील मोठ्या कौतुकाने या गंगा निवासला भेट देतात.बाबासाहेबाच्या अशा स्मृती आपल्या घरात असल्याने अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया पसलेलू कुटुंबिय व्यक्त करतायत.

  • Related Posts

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    जळगावात एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. हर्षल थाडे या मुलाला चालता येत नसल्याने रुग्णालयात दाखल केले होते, जिथे डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर…

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची त्यांच्याच पत्नीने हत्या केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी पल्लवी यांनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप.

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    डिनरला माशांवर ताव, तितक्यात बायकोचा हल्ला अन् काही मिनिटांत..; माजी डीजीपींसोबत काय घडलं?

    अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 2 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार.

    अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार; 2 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार.

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…