रेशीम दोरखंड, चांदीचा पेला, बाबासाहेबांनी विहिरीतून पाणी काढलं, सोलापुरातील आठवणी!

महामानवाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1937 साली सोलापूर दौऱ्यावर होते. बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आज ही जपून ठेवल्या आहेत.बोधिस्तव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आहे. देशभरात मध्यरात्रीपासूनच मोठ्या उत्साहात महामानवाला वंदन करण्यासाठी भीम अनुयायी रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आज अभिवादन करत असताना त्यांच्या असंख्य आठवणी आजही भारतीयांसाठी पूजनीय आहे. असाच अमूल्य ठेवा सोलापूरकरांनी जपून ठेवला आहे. महामानवाच्या 1937 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आज ही जपून ठेवल्या आहेत.त्याकाळी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने विहीर बांधली होती. लोकांनी या विहिरीतून पाणी काढण्याची विंनती बाबासाहेबाना केली. लोकांच्या आग्रहाखातर रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून बाबासाहेबांनी पाणी काढले.

त्याकाळी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथे सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाने विहीर बांधली होती. लोकांनी या विहिरीतून पाणी काढण्याची विंनती बाबासाहेबाना केली. लोकांच्या आग्रहाखातर रेशीमच्या दोरखंडाने चांदीच्या पेल्यातून बाबासाहेबांनी पाणी काढले.त्यानंतर स्वतः हे पाणी प्राशन केलं. तेव्हापासून आजतगायत वळसंग गावातील हजारो नागरिक या विहिरीतील पाण्याला अमृताहून अधिक महत्व देतात.वळसंग येथीलया ऐतिहासिक क्षणावरून विहिरीला ‘आंबेडकर बावडी’ असं नावं देण्यात आलय. वळसंग येथील ‘आंबेडकर बावडी’ विहिरीवर आजही भीम अनुयायी भेट देतात. नुकतचं या विहिरीवर प्रशासनाच्यावतीने डोम देखील वांधण्यात आले आहे.बाबासाहेबांच्या दौऱ्यांची अशीच आठवण सोलापुरातील पसलेलू कुटुंबाने जपून ठेवलीय.

14 जानेवारी 1946 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते.त्यावेळी फ़ॉरेस्ट भागातील गंगा निवास येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्काम केला. सकाळी याचं घरात बाबासाहेबांनी नाश्ता ही केला. याच आठवणी जपत ज्या ताटात बाबासाहेबांनी नाश्ता केला ते ताट, ग्लास, वाटी, कप असे सर्व साहित्य पसलेलू कुटुंबाने मोठ्या अभिमानाने जपून ठेवल्या आहेत.भीम अनुयायी देखील मोठ्या कौतुकाने या गंगा निवासला भेट देतात.बाबासाहेबाच्या अशा स्मृती आपल्या घरात असल्याने अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया पसलेलू कुटुंबिय व्यक्त करतायत.

  • Related Posts

    पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवाद्यांसाठी तिजोरी उघडली; मसूदच्या कुटुंबाला 14 कोटी रुपयांची मदत, पुन्हा दहशतवादी छावण्याही उभारणार.

    या हल्ल्यांमध्ये 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले आणि 78 जण जखमी झाले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक प्रताप उघडकीस आलाय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी…

    अमरावती, अकोला, परतवाड्यासह यवतमाळच्या सराफ दुकानात आयकर विभागाच्या धाडी; सराफा वर्तुळात खळबळ, नेमकं कारण काय?

    अमरावती, अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्स या दुकानावर आज (14 मे 2025)आयकर विभागाने (Income Tax Department) एकाएकी धाडी टाकल्याचे समोर आले आहे. एकता ज्वेलर्सची मुख्य शाखा ही अमरावती शहरातील जयस्तंभ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवाद्यांसाठी तिजोरी उघडली; मसूदच्या कुटुंबाला 14 कोटी रुपयांची मदत, पुन्हा दहशतवादी छावण्याही उभारणार.

    पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवाद्यांसाठी तिजोरी उघडली; मसूदच्या कुटुंबाला 14 कोटी रुपयांची मदत, पुन्हा दहशतवादी छावण्याही उभारणार.

    अमरावती, अकोला, परतवाड्यासह यवतमाळच्या सराफ दुकानात आयकर विभागाच्या धाडी; सराफा वर्तुळात खळबळ, नेमकं कारण काय?

    अमरावती, अकोला, परतवाड्यासह यवतमाळच्या सराफ दुकानात आयकर विभागाच्या धाडी; सराफा वर्तुळात खळबळ, नेमकं कारण काय?

    हर्षवर्धन सपकाळांनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? सपकाळांनी दिली महत्वाची माहिती.

    हर्षवर्धन सपकाळांनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? सपकाळांनी दिली महत्वाची माहिती.

    अमेरिका अन् चीननं एकमेकांवरील टॅरिफ केलं कमी, व्यापार युद्ध थांबणार? जाणून घ्या सविस्तर.

    अमेरिका अन् चीननं एकमेकांवरील टॅरिफ केलं कमी, व्यापार युद्ध थांबणार? जाणून घ्या सविस्तर.