बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने पुण्यात खळबळ .

पुण्याच्या राजगुरुनर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेसंदर्भातील सीसीटिव्ही फुटेजही समोर आला आहे.पुण्याच्या राजगुरुनर येथून  बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात जाण्याचे कारण सांगून गेलेली बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज सकाळी भीमा नदी पात्रात आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (११ एप्रिल)रोजी ही अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाण्याचे कारण सांगून गायब झाली होती. तसेच एका तरुणासोबत ही मुलगी दुचाकीवरून जाताना सीसीटिव्हीत देखील समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सूरू केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात आढळून आला आहे. तपासणीत मुलीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापती आढळून आल्या आहेत. यावरून पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकून दिल्याचा संशय आहे. मुलीच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. ही हत्या नेमकी का झाली? याचा तपास सुरु केला आहे.सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचा पुरावा

पोलीस तपासात मुलीला दुचाकीवरून घेऊन जाणारा तरुण कोण होता, याचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील माहितीच्या आधारे या मुख्य संशयिताची ओळख पटवण्यासाठी आणि हत्येचे कारण शोधण्यासाठी खेड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत.खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीच्या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी या क्रूर हत्याकांडाचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, लवकरात लवकर आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.

  • Related Posts

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

    जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी सराव सुरु झाला आहे.नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात…

    ‘ए…चावी का काढलीस?’ ओव्हरटेक केलं म्हणून गाडी थांबवली, तीच चूक तरुणाच्या जीवावर बेतली, नेमकं काय घडलं?

    चाव्या काढल्यामुळे संतापलेल्या नीलेशने ट्रकमध्ये ठेवलेला धारदार चाकू काढून वंशवर सपासप वार केले. वंशचा सहकारी उत्कर्ष विरखेडे वाद मिटवण्यासाठी पुढे आला असता, त्याच्यावरही नीलेशने हल्ला चढवला. या हल्ल्यात उत्कर्ष जखमी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

    ‘ए…चावी का काढलीस?’ ओव्हरटेक केलं म्हणून गाडी थांबवली, तीच चूक तरुणाच्या जीवावर बेतली, नेमकं काय घडलं?

    ‘ए…चावी का काढलीस?’ ओव्हरटेक केलं म्हणून गाडी थांबवली, तीच चूक तरुणाच्या जीवावर बेतली, नेमकं काय घडलं?

    भाजपचं ठरलं… शहराचा नवा कारभारी कोण? माजी महिला नगरसेविकेचे नाव चर्चेत, इच्छुकांची लॉबिंग.

    भाजपचं ठरलं… शहराचा नवा कारभारी कोण? माजी महिला नगरसेविकेचे नाव चर्चेत, इच्छुकांची लॉबिंग.

    साखर झोपेत असताना मालवाहू कंटेनरने दिली घराला धडक, एकाचा जागीच मृत्यू, चालक फरार.

    साखर झोपेत असताना मालवाहू कंटेनरने दिली घराला धडक, एकाचा जागीच मृत्यू, चालक फरार.