रायगडाच्या मातीची शपथ घ्या अन् सत्य बोला…; अरविंद सावंतांची अमित शहांवर जोरदार टीका.

शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला सोबत घेतले, याचा अर्थ समजून रायगडावरून चौफेर नजर टाकून महाराष्ट्र ओळखावा असा सल्लाही सांवत यांनी दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडावर गेलेल्या गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावरची माती डोक्याला लावून आपला नेमका शत्रू कोण आहे, हे ओळखावे आणि सत्य बोलण्याची शपथ घ्यावी’ असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सांवत यांनी लगावला. शहा यांनी देशात अनेक शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला सोबत घेतले, याचा अर्थ समजून रायगडावरून चौफेर नजर टाकून महाराष्ट्र ओळखावा असा सल्लाही सांवत यांनी दिला आहे.नाशिक दौऱ्यावर असलेल्या सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावर टीका केली. देशात कायदा सुव्यवस्था राखली जावी, असे वाटत असेल त्यांनी स्वतःहून चर्चा निर्माण केली पाहिजे. जे गुन्हेगार नाहीत त्यांना शिवाजी महाराज शासन देत नव्हते. परंतु, येथे पळवाटा काढल्या जातात. सीबीआय, ईडीच्या माध्यमातून विरोधकांवर कारवाई केली जाते. रायगडावरून त्यांची चौफेर नजर गेली पाहिजे.

शिवाजी महाराजांची लढाई अतिक्रमित आणि घुसखोरांच्या विरोधात होती.स्वराज्यनिर्मितीची लढाई होती असे सांगत, तेव्हाच्या आणि आताच्या स्वराज्याच्या लढाईत मात्र यांचा पक्ष नव्हता, असा चिमटा सावंत यांनी काढला आहे. स्वराज्य मिळाल्यावर सगळ्यांना सोबत घेऊन जावे लागते. परंतु, ‘सबका साथ सबका विकास’ असा डॉयलॉग मारणे सोप्पे असते, अशी टीका त्यांनी भाजप आणि शहा यांच्यावर केली. राणे पितापुत्रांच्या वक्तव्यांची दखल घेऊ नये, असे सांगत बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देतांना नारायण राणेंचे पुत्र नीलेश राणेंची वक्तव्ये काय होती, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला.वक्फ विधेयकावरून इंडिया आघाडीवर टीका करणाऱ्या विरोधकांवरही सांवत यांनी टीका केली आहे. नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू कुठे हिंदुत्ववादी आहेत, त्यांच्या कुबड्यांवरच सरकार उभे असल्याचेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना हुडहुडी आली असेल म्हणून ते रात्री अपरात्री गृहमंत्री शहा यांना भेटत असतील, असा टोलाही त्यांनी मारला.वक्फ सुधारणा विधेयक आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. समितीने सुचविलेल्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. आम्ही विरोध केला असे सांगत, यांनी हिंदूच्या जमिनी लुटल्या, मंदिरांच्या खजिन्यांचे काय झाले, केदारनाथ मंदिरातील सोने कुठे गेले, असा सवाल सावंत यांनी केला. सोने चोरीला गेल्यावर गृहमंत्री काय करतात, असा सवाल करतानाच वक्फविरोधातील आंदोलन झाकण्यासाठी तहव्वूर राणाचा विषय आणल्याचे सावंत म्हणाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात राणा कारस्थानी होता. प्रत्यक्षात तो नव्हता, असे सांगत वक्फविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा विषय बंद व्हावा, यासाठीच त्याला आणल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्याच्यामुळे निष्पाप १६६ जणांचा बळी गेले. त्यामुळे त्याला फाशी द्यावी, अशी आमचीही मागणी असल्याचे ते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.