टेकडीवरून खाली उतरताना, त्यांनी पहिलं त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या हातावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे कापले. अडचणींपासून वाचवण्यासाठी असलेले ते रक्षाकवचाचे धागे त्यांच्यासाठी मृत्यूचा फास बनले होते. दहशतवाद्यांनी त्यांना हिंदू म्हणून ओळखू यासाठी, त्यांनी मनगटावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे तोडून टाकले.२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमूखी पडलेले IB अधिकारी मनीष रंजन यांच्या पत्नी जया मिश्रा अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहित. मनीष रंजन हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. त्या काळ्या दिवसामुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. ज्याची आठवण येताच त्या आपली शुद्ध हरपतात.
जय मिश्रा सांगतात की दहशतवाद्यांनी मनीषचे नाव आणि धर्म विचारला आणि नंतर त्यांच्यावर १० ते १२ गोळ्या झाडल्या. जया आणि तिच्या मुलांनी मनीषला, त्यांच्या डोळ्यासमोर गोळ्या घालून ठार मारताना पाहिले. असहाय्य आणि रक्ताने माखलेले मनीष जमिनीवर पडले होते. “काश्मीरच्या डोंगररांगांमध्ये गोळीबाराचे आणि लोकांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होते. परिस्थिती इतकी भयानक होती की आमच्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी तिथून पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता” असे जया सांगतात.अशा कठिण प्रसंगी जयाने मुलांसह त्या टेकड्यांमधून खाली उतरणेच योग्य मानले. टेकडीवरून खाली उतरताना, त्यांनी पहिलं त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या हातावर बांधलेले रक्षाकवचाचे धागे कापले.









