जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी सराव सुरु झाला आहे.नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी सराव सुरु झाला आहे. सैनिकी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यानंतर आता भारतानं फ्रान्ससोबत मोठा करार केला आहे. २६ राफेल मरीन विमानं खरेदी करण्यासाठी दोन देशांमध्ये करार झाला आहे. हा करार ६३ हजार कोटी रुपयांचा आहे.नव्या करारानुसार भारतीय नौदल फ्रान्सकडून २६ लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. या करारावेळा भारताचं प्रतिनिधीत्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केलं. यावेळी नौसेनेचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल के. स्वामीनाथनदेखील उपस्थित होते. भारताला फ्रान्सकडून २२ सिंगल-सीट आणि ४ ट्विन-सीट विमानं मिळतील. या कराराचा मोठा फटका पाकिस्तानला बसेल. कारण भारतीय नौदल नवी विमानं आयएनएस विक्रांतवर तैनात करणार आहे. १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलानं पाकिस्तानची दाणादाण उडवली होती. आता नव्या विमानांमुळे नौदलाची ताकद आणखी वाढेल.










