पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी सराव सुरु झाला आहे.नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी लष्करी सराव सुरु झाला आहे. सैनिकी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यानंतर आता भारतानं फ्रान्ससोबत मोठा करार केला आहे. २६ राफेल मरीन विमानं खरेदी करण्यासाठी दोन देशांमध्ये करार झाला आहे. हा करार ६३ हजार कोटी रुपयांचा आहे.नव्या करारानुसार भारतीय नौदल फ्रान्सकडून २६ लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. या करारावेळा भारताचं प्रतिनिधीत्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केलं. यावेळी नौसेनेचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल के. स्वामीनाथनदेखील उपस्थित होते. भारताला फ्रान्सकडून २२ सिंगल-सीट आणि ४ ट्विन-सीट विमानं मिळतील. या कराराचा मोठा फटका पाकिस्तानला बसेल. कारण भारतीय नौदल नवी विमानं आयएनएस विक्रांतवर तैनात करणार आहे. १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलानं पाकिस्तानची दाणादाण उडवली होती. आता नव्या विमानांमुळे नौदलाची ताकद आणखी वाढेल.

फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून तयार केल्या जाणाऱ्या राफेल-एम विमानांचा वापर विविध प्रकारच्या कारवायांसाठी केला जाऊ शकतो. ही विमानं नौदलासाठी गेमचेंजर ठरु शकतात. या करारामुळे भारताची सागरी सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. २०२९ पासून भारताला विमानं मिळण्यास सुरुवात होईल. २०३१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.राफेल मरीन लढाऊ विमानाचं महत्त्व १. सागरी सुरक्षा आणि भौगोलिक प्रभुत्व भारताच्या भौगोलिक स्थानामुळे हिंदी महासागर पट्ट्यात देशाची ताकद मोठी आहे. हिंदी महासागरातून जागतिक व्यापार चालतो. सामरिकदृष्ट्याही हा भाग संवेदनशील आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीननं हिंदी महासागरातील ताकद वाढवली आहे. त्यामुळे भारतीय नौदलाला आपली ताकद वाढवणं गरजेचं ठरतं.

राफेल मरीन विमानांची रचना विमानवाहू नौकांसाठी करण्यात आलेली आहे. सागरी टेहळणी, हवाई हल्ले, जहाजविरोधी युद्ध यासारख्या अनेक कारवाया फत्ते करण्याची ताकद राफेल एममध्ये आहे. २. जुन्या मिग-२९ के विमानांची जागा घेणार भारतीय नौदल सध्याच्या घडीला विमानवाहू नौकांवर मिग-२९ के लढाऊ विमानांचा वापर करतं. राफेल मरीन जेट्स नौदलाच्या ताफ्यावर आल्यावर मिग-२९ के विमानांची जागा घेतील. राफेल-एम अत्याधुनिक, विश्वसनीय असल्यानं नौदलाची ताकद कैकपटीनं वाढेल. यामुळे नौदलाची कार्यक्षमता वाढेल. सोबतच देखभाल, दुरुस्तीवरील खर्च कमी होईल. भारतीय हवाई दल आधीपासूनच राफेल विमानांचा वापर करत आहे.३. सामरिक आव्हानांना प्रत्युत्तरभारताला आपल्या शेजारी देशांकडून, विशेषत: चीन आणि पाकिस्तानकडून, सामरिक आव्हानांचा सामना करावा लागतो. चिनी नौदल सातत्यानं आपल्या क्षमतांचा विस्तार करत आहे. पाकिस्तानही आपली सागरी ताकद वाढवण्याचे प्रयत्न सतत करत आहे. राफेल एमच्या तैनातीमुळे शेजारी देशांच्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करता येईल. ही विमानं मेटियोर, स्कॅल्प, एक्सोसेटसारखी क्षेपणास्त्रं डागू शकतात. आकाश, समुद्र आणि जमिनीवरील लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये आहे. त्यामुळे भारतीय नौदलला अदृश्य कवच मिळेल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.