काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. जो तो सदरचा मृतदेह कोणाचा?, कशामुळे त्याचा जीव गेला? ‘घातपात कि आत्महत्या?’ याबाबत तर्क वितर्क लावू लागले.

अखेर दोडामार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह दोडामार्ग रुग्णालयात आणण्यात आला.घटनास्थळचा पंचनामा आणि तिथल्या लोकांकडून माहिती घेतली असता सदरचा मृतदेह विर्डी येथील विद्देश लाडू गवस (वय ४५) या युवकाचा असल्याचे समजले.

दोन दिवसांपूर्वी कामावर जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. तो मात्र झाडावर लटकलेल्या वेदनादायी अवस्थेत मिळाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मयत विद्देश यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने दोडामार्ग तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    अहिरवाडीत पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी नेणार्‍या दहा गोवंशाची सुटका.

    रावेर पोलिसांनी गोवंशाची कत्तल होण्यापासून सुटका करीत वाहन जप्त करीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. अहिरवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.गोपनीय माहितीवरून कारवाईमध्यप्रदेशातून एका वाहनातून गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती रावेर…

    तरुणाच्या डोक्यात हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून घातला दगड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

    केवळ दुचाकीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून राग आल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील धानवड येथे घडली. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी घडली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस.

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस.

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

    कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

    देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.

    देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.