नरेश वालदे यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट चारने नीतेश ऊर्फ नाना मेश्राम व त्याच्या दोन साथीदारांना मौदा परिसरात अटक केली.इमामवाडा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच नरेश संताराम वालदे (वय ५५, रा. इंदिरानगर, जाटतरोडी) यांचा खून झाल्याची (Nagpur Murder) धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी वेळीच नानाविरुद्ध कारवाई केली असता तर खुनाची घटना (Crime News) टळली असती, असे बोलले जात आहे.
दरम्यान, नरेश यांच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट चारने नीतेश ऊर्फ नाना मेश्राम (वय २६) व त्याच्या दोन साथीदारांना मौदा परिसरात अटक केली. ईश्वर ऊर्फ जॉकी राजेश सोमकुंवर (वय ३२) व अक्षय दीपक आवळे (वय २९, तिन्ही रा. रामबाग) अशी अटकेतील अन्य मारेकऱ्यांची नावे आहेत.











