आई, मुलगा, सून आणि नातू… एकाच कुटुंबातील चौघं मृतावस्थेत आढळले, एका चिठ्ठीमुळे खळबळ.

कर्नाटकातील म्हैसूर येथील एका घरात सोमवारी आई, मुलगा, सून आणि नातू असे चौघे जण मृतावस्थेत आढळले. एकाच कुटुंबातील चौघा जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाने कुटुंबाची सामूहिक हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे, मात्र मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही.चेतन (४५), त्याची पत्नी रुपाली (४३), त्यांचा १५ वर्षीय मुलगा आणि चेतनची आई प्रियंवदा (६२) अशी मृतांची नावे आहेत. चेतन हा एक व्यापारी होता. तो त्याच्या कुटुंबासह म्हैसूर येथील विश्वेश्वरैया नगरमध्ये राहत होता. त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे.

म्हैसूर शहर पोलिस आयुक्त सीमा लाटकर यांनी डीसीपी (गुन्हे आणि वाहतूक) एस जान्हवी यांच्यासोबत घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, मयत कुटुंब दोन फ्लॅटमध्ये राहत होते. एका फ्लॅटमध्ये चेतनचे कुटुंब आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये त्याची आई राहत होती. पोलिसांनी सांगितले की, चेतन हा मेकॅनिकल इंजिनिअर होता आणि तो मध्य पूर्व देशात काम करत होता आणि २०१९ मध्ये भारतात परतला.”आम्हाला संशय आहे की चेतनने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विष पाजले आणि नंतर आत्महत्या केली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रविवारी संपूर्ण कुटुंब गोरुर येथील एका मंदिरात गेले आणि परत येताना ते म्हैसूर येथील रुपाली यांच्या घरी गेले. घरी परतण्यापूर्वी त्यांनी जेवण केले” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. विद्यारण्यपुरम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दुसरीकडे, जालना जिल्ह्यात अंबड शहरातील पठाण मोहल्ला भागात राहणाऱ्या कलीम शेख खाजा शेख (वय ३०) या तरुणाचा शनिवारी रात्री चाकूने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास कलीम शेख यास पठाण मोहल्ल्यातील लाहोटी यांच्या घरासमोर गाठून सरफराज फेरोज शेख व अन्य तीन जणांनी त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या कलीमला जालना येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते,उपचार सुरू असताना तो मरण पावला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सरफराज शेख यांच्यासह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.