मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मंगळवारी रात्री दुचाकीला अज्ञात कंटेनरने धडक दिल्याने भीषण असा अपघात घडला आहे. या अपघातात एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मंगळवारी रात्री दुचाकीला अज्ञात कंटेनरने धडक दिल्याने भीषण असा अपघात घडला आहे. या अपघातात एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत .
सुभाष अमृत वड (वय २५) आणि स्वप्नील परब (वय २०) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. सुभाष वड, स्वप्निल परब आणि त्यांचे दोन साथीदार असे चौघेजण एकाच दुचाकीवर स्वार होऊन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून ढेकाळे येथून बोईसर नजीक असलेल्या मान परिसरात जाण्यासाठी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर हालोली गावाच्या हद्दीत असलेल्या भिवंडी ढाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात कंटेनरले जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडला. मंगळवारी रात्री एक वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे.दुचाकीला कंटेनरच्या बाजूची धडक लागल्याने दुचाकीसह दुचाकीस्वार सर्वजण रस्त्यावर खाली पडले. यावेळी सुभाष आणि स्वप्नील हे दोघेही कंटेनरच्या टायर खाली चिरडले गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर भावेश गणेश दांडूळे (वय २८) राज सञु मिश्रा (वय १९) हे दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या अपघातप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









